शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

'बंडोबाणांचा' संडे: बंडखोरांना शांत करण्याचे पक्षांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 11:46 AM

बंडखोर पक्ष उमेदवाराच्या विनंतीला मान देतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बऱ्याच मतदारसंघात महत्वाच्या पक्षातील इच्छुकांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरले आहे. तर त्यातील अनेकांचे उमेदवारी अर्ज शनिवारी झालेल्या छाननीत वैध सुद्धा ठरले आहे. त्यामुळे पक्षाचे अधिकृत उमेदवारांची चिंता वाढली असून, बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी पक्ष उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. तर आज रविवार असल्याने उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा उद्याचा ( सोमवार ) शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 'बंडोबाणांचा' संडे असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.

अर्ज छाननी होताना अनेक बंडखोरांचे अर्ज रद्द होतील, अशी अपेक्षा सर्वच पक्षातील अधिकृत उमेदवारांना होती. मात्र बऱ्याच ठिकाणी बंडखोरांचे अर्ज वैध ठरली आहे. त्यामुळे पक्ष उमेदवारांची चिंता वाढली आहे. तर सर्वच पक्षातील पक्षश्रेष्ठींनी बंडखोरांवर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे.तसेच पक्ष उमेदवार यांनी बंडखोरांच्या भेटीगाठी घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आलेल्या संधीचं सोण करू पाहणाऱ्या बंडखोरांनी उमेदवारांकडे आश्वासनांची यादीच   सादर केली असल्याचे सुद्धा काही ठिकाणी पहायला मिळत आहे.

आज रविवार असल्याने सोमवारीच अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस बंडखोरांना सांभाळताना पक्ष उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत राजकीय परिस्थितीविषयी उत्कंठा वाढली असून बंडखोर पक्ष उमेदवाराच्या विनंतीला मान देतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजप-शिवसेनेत सुद्धा मोठ्याप्रमाणावर बंडखोरी झाली असल्याचे चित्र आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसात बंडखोरांनी माघार घ्यावे अन्यथा कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर सुद्धा पक्षाच्या नेत्यांंकडून बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. तर अनेक बंडखोरांनी आता माघार नाहीच, अशी भूमिका घेतली असल्याने पक्ष उमेदवार यांच्या अडचणी वाढल्या आहे.