शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

गोर्डेंनी ऐनवेळी राष्ट्रवादीची मिळवलेली उमेदवारी; सेनेच्या भुमरेंना पडणार भारी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 4:32 PM

राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संजय वाघचौरे नाराज असून, ते गोर्डे यांच्या प्रचारापासून लांब असल्याचे दिसत आहे.

मुंबई - राजकरणात कधी काय होईल यांचा अंदाज नसतो. असेच काही पैठण विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. कधीकाळी कट्टर शिवसैनिक असलेले आणि त्यांनतर भाजपमध्ये गेलेले दत्ता गोर्डे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवत, राजकीय गुरूलाच आव्हान देत मैदानात उतरले आहे. त्यामुळे पैठण मतदारसंघातील लढत चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्यावेळी आमदार भुमरे पैठणमधून चौथ्यांदा ( २००९ सोडून ) आमदार म्हणून निवडून आले. मात्र भुमरेंच्या राजकीय तालमीतील मल्ल समजले जाणारे दत्ता गोर्डेचं आता त्यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहे. गोर्डे हे भाजपमध्ये असताना सुद्धा या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडली नव्हती. तर भुमरेंच्या विरोधात कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणारचं अशी भूमिका गोर्डे यांनी यावेळी घेतली होती.त्यामुळे ऐनवेळी गोर्डे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवत, भूमरेंच्या विरोधात दंड थोपटले. तर या दोन्ही नेत्यांनी मतदारसंघात सभा व बैठकीचा धडाकाच लावला असून, संदीपान भुमरे व दत्ता गोर्डे यांच्यातचं खरी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुरु-शिष्याच्या लढाईत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संजय वाघचौरे नाराज असून, ते गोर्डे यांच्या प्रचारापासून लांब असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तर शिवसेनेचे भुमरेंसाठी भाजपचे नेते प्रचारात उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे काँग्रेसचे नेते सुद्धा गोर्डेंचा प्रचार करतांना दिसत आहे. त्यामुळे पैठणमध्ये शिवसेना पुन्हा गड राखणार की परिवर्तन होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

जातीय समीकरणे ठरणार महत्वाचे

वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण रिंगणात असून, दलित समाजातील मतदार बरोबरच बंजारा समाजातील मते त्यांच्या बाजूने पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सहाजिकच याचा फटका भुमरे यांना बसू शकतो. तर राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहणारा मुस्लीम समाज एमआयएमसोबत जाण्याची शक्यता असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळे यावेळी पैठण विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीत जातीय समीकरणे महत्वाचे ठरणार असल्याचे पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.