शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मनसेचा 'दस का दम'; राज ठाकरेंच्या इंजिनाला इंधन देणारे आकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 21:11 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल सत्ताधारी पक्षाची काहीशी निराशा करणारे तर विरोधी पक्षांचे मनोबल वाढवणारे ठरले आहेत.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल सत्ताधारी पक्षाची काहीशी निराशा करणारे तर विरोधी पक्षांचे मनोबल वाढवणारे ठरले आहेत. एकीकडे भाजपा आणि शिवसेना महायुतीची सत्ता आली तरी त्यांचे सभागृहातील संख्याबळ घटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे संख्याबळ बऱ्यापैकी वाढले आहे. राज ठाकरे यांच्या मनसेसाठीही ही निवडणूक किंचीत दिलासा देणारी ठरली आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील यांच्या रूपात मनसेचा आमदार विधानसभेत पोहोचला आहे. सोबतच इतर काही ठिकाणी मिळालेली मते मनसेचा आत्मविश्वास वाढवणारी आहेत. मनसेला केवळ एका जागेवर विजय मिळाला असला तरी राज्यातील अन्य काही मतदारसंघात मनसेचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले आहेत. संतोष नलावडे (शिवडी), संदीप देशपांडे (माहीम), नयन कदम (मागाठाणे), संदीप जळगावकर (भांडूप पश्चिम) हर्षला चव्हाण (मुलुंड प.), अविनाश जाधव (ठाणे), मंदार हळबे (डोंबिवली) शुभांगी गोवरी (भिवंडी ग्रामीण), किशोर शिंदे (कोथरूड) या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्याबरोबरच काही मतदारसंघात मनसेचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले. 

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत. दरम्यान, निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेच्या चढाओढीवरून कुरघोडी सुरू झाली आहे. तसेच शिवसेना भाजपाला सत्तावाटपाच्या ५०-५० फॉर्म्युल्याची सतत आठवण करून देत आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे