शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र दिसला नाही, राज्यपालांच्या अभिभाषणाला काँग्रेसने केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:53 IST

Maharashtra Assembly Budget Session: राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून, हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी  टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आज केली. 

मुंबई – राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून, हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी  टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आज केली. 

राज्यपालांच्या अभिभाषणाला काँग्रेसने विरोध केला. या प्रस्तावावर चर्चा करताना ,छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचा अवमान करायचा, हे या सरकारचे धोरण आहे,असे विजय वडेट्टीवार म्हणाले. राजभवनात बसून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई आणि महात्मा फुलेंचा अपमान करणाऱ्यांना या सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. केवळ राजकारणासाठी महापुरुषांची नावे वापरली जात आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना जगण्याचा समान अधिकार दिला पण राज्यातील मंत्री. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी विधान करतात. महायुती सरकारमुळे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडला आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

सरकारच्या २०४७ च्या 'व्हिजन'चे चित्र रंगवले. वर्ष २०२४ मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करणार अस हेच सरकार सांगत होतें. त्याचा विसर पडलेले सरकार आता थेट ५ ट्रिलियनची भाषा करत आहे! एक ट्रिलियनचे काय झालं हेच माहित नाही आणि २०२६ मध्ये २०४७ ची भाषा करणे संयुक्तिक आहे का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांनी दगडधोंडे खाल्ले आणि त्याच महाराष्ट्रात आता राज्यातील २२०० शाळांमध्ये शिक्षक नाहीत, मराठी शाळा बंद पडत आहेत. कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटी खर्च करणाऱ्या सरकारने कुंभसाठी दोन हजार कोटी कमी खर्च करावे. त्यातील २ हजार कोटी शिक्षणासाठी द्यावे ,अस वडेट्टीवार आपल्या भाषणात म्हणाले. सरकारकडे रुग्णवाहिका दुरुस्त करायला पैसे नाहीत, ते ५ ट्रिलियनच्या गप्पा मारत आहे  असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

औषध बनवणाऱ्या कंपन्यांना 'दप्तर' बनवण्याचे कंत्राट देऊन मर्जीतील लोकांचे खिसे भरले जात आहेत.  ताडोबा व्याघ्र प्रकल्पा शेजारील जमीन आणि नागपूर वनविभागाची वन्यप्राणी अधिवासाची जमीन उद्योगपतींच्या घशात घातली जात आहे. १० कोटी वृक्ष लावण्याच्या गप्पा मारणारे सरकार जंगले साफ करत आहे. हवा, पाणी आणि जमीन विकण्याचे पाप हे सरकार करत आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.

राज्यात शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. एकट्या यवतमाळ आणि अमरावतीत भीषण परिस्थिती आहे. कर्जापायी शेतकऱ्यांना किडन्या विकाव्या लागत आहेत, ही राज्यासाठी शरमेची बाब आहे. तरीही अभिभाषणात शेतकरी 'कर्जमुक्ती'चा साधा उल्लेखही नाही. या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले हे यातून स्पष्ट होते अस वडेट्टीवार म्हणाले.

दावोसमध्ये जाऊन केलेले करार म्हणजे निव्वळ आकड्यांची फुगवट आहे. भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या कंपन्यांशी तिकडे जाऊन करार करण्याचे काय प्रयोजन? दरवर्षी दावोस मधील गुंतवणूक आणि रोजगाराचे आकडे वाढत आहेत पण प्रत्यक्षात यातून किती रोजगार मिळाला, याची श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला विरोध करताना केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress opposes Governor's address, slams unfulfilled promises to farmers.

Web Summary : Congress criticized the Governor's address as a rehash of old promises, accusing the government of neglecting farmers, education, and social harmony. They questioned the government's economic goals and accused them of corruption and favoring certain businesses over public welfare.
टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार