शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

"कोरटकर वगैरे चिल्लर लोक, त्याच्यावर कारवाई होणारच, पण तुम्ही पं. नेहरूंचा निषेध करणार का? आहे का हिंमत’’, फडणवीसांचा विरोधकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:46 IST

Maharashtra Assembly Budget Session: कोरटकर वगैरे चिल्लर लोक आहेत, त्यांच्यावर कारवाई होणारच, पण तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामधून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या लिखाणाचा निषेध करणार का? असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून आज विधान परिषदेमध्ये जोरदार गदारोळ झाला. औरंगजेब बादशहाची स्तुती करणाऱ्या अबू आझमींच्या निलंबनाचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर विरोधकांनी प्रशांत कोरटकर याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी विरोधकांना प्रत्युत्तर देताना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत कोरटकर वगैरे चिल्लर लोक आहेत, त्यांच्यावर कारवाई होणारच, पण तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामधून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या लिखाणाचा निषेध करणार का? असा प्रतिप्रश्न विरोधकांना केला. त्यावरून सभागृहातील वातावरण काही काळ चांगलंच तापलं.

प्रशांत कोरटकरने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तितक्याच आक्रमकपणे विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, कोरटकरला १०० टक्के अटक होईल. मात्र त्याने कोल्हापूरमधील न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. मात्र त्याविरोधात मी वरच्या कोर्टात जाण्यास सांगितलं आहे. पण ही कोरटकर वगैरे माणसं चिल्लर आहेत. जितेंद्र आव्हाड काय बोलले होते त्याचा तुम्ही कधी निषेध केलेला नाही. औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराजांना ओळखलं जातं, औरंगजेब किती बलाढ्य होता आणि शिवाजी महाराज पाच फुटाचे होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. हे रेकॉर्डवर आहे, याचा तुम्ही निषेध केलेला नाही. असा सिलेक्टिव्ह निषेध करू नका, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या डिस्कव्हरी ऑफ इंडियाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं आहे, त्याचा तुम्ही निषेध करणार आहात का? आहे का हिंमत? असा सवाल विरोधकांना केला. फडणवीस यांनी हा उल्लेख करताच विरोधकांनी गोंगाट करून जोरदार गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. 

''आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. त्यामुळे याठिकाणी पंडित नेहरू यांचाही निषेध झाला पाहिजे'', असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूVidhan Parishadविधान परिषद