शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला; मुंबईतील मृतांचा आकडा 5000 पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 20:53 IST

९१ हजार ६५ रुग्णांवर उपचार, आतापर्यंत १ लाख २३ हजार १९२ कोविडमुक्त

मुंबई : राज्यात बुधवारी ६ हजार ६०३ रुग्णांची नोंद करण्यात आली, तर १९८ मृत्यू झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या २ लाख २३ हजार ७२४ झाली आहे. याखेरीज, मृतांचा आकडा ९ हजार ४४८ झाला आहे. दिवसभरात ४ हजार ६३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख २३ हजार १९२ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.०६ टक्क्यांवर पोहोचले असून मृत्यूदर ४.२२ टक्के झाला आहे. राज्यात बुधवारी नोंद झालेल्या १९८ मृत्यूंमध्ये मुंबईत ६२, ठाणे २८, नवी मुंबई ८, पालघर ३, रायगड ३, पनवेल मनपा ३, नाशिक मनपा ५, अहमदनगर १, जळगाव ८, जळगाव मनपा २, पुणे ४, पुणे मनपा २७, पिंपरी चिंचवड मनपा ५, कोल्हापूर ३, सांगली मिरज कुपवाड मनपा २, औरंगाबाद ३, औरंगाबाद मनपा ५, जालना ३, बीड १, नांदेड २, अकोला मनपा २, यवतमाळ १ आणि नागपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत १ हजार ३४७ रुग्ण तर ६२ मृत्यू झाले आहे. शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या ८७ हजार ८५६ असून मृत्यू ५ हजार ६४ झाले आहेत. आतापर्यंत ५९ हजार २३८ कोविडमुक्त झाले आहेत. सध्या २३ हजार ५४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ९१ हजार ५४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८.७७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३८ हजार ७६२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत. तर ४७ हजार ७२ व्यक्ती संस्थात्मक अलगीकऱणात आहेत.

ठाण्यात रुग्णांची संख्या वाढतीच

ठाणे जिल्ह्यात सध्या ५२ हजार ७३३ कोरोना बाधित आहेत. तर १ हजार ४१७ मृत्यू झाले आहेत. मुंबईच्या तुलनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सात हजाराने अधिक आहेत. मुंबईत २३ हजार ५४३ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ठाण्यात ३० हजार ६३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ठाण्यात २१ हजार २५२ रुग्ण कोरोना (कोविड)मुक्त झाले आहेत.

एकूण रुग्णसंख्येत १३ हजारांहून अधिक प्रौढ रुग्णांचा समावेश

राज्याच्या एकूण रुग्णसंख्येने दोन लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या अहवालानुसार ,कोरोना बाधितांच्या संख्येत ११ ते २० वयोगटातील १३ हजार ९९० प्रौढ रुग्ण आहेत. या रुग्णांचे प्रमाण ६.६३ टक्के आहे. तर शून्य ते १० वयोगटातील साडे सात हजारांहून अधिक रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येत या रुग्णांचे प्रमाण ३.६६ टक्के आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले

1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई