शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

विधानसभेला राज्यात मध्यप्रदेश, राजस्थानची पुनरावृत्ती ; आघाडीच्या नेत्यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 1:06 PM

राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. देशातील जनतेने नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी दिली. परंतु, केंद्रात जरी मोदींना संधी दिली असली तरी राज्यात आघाडीचं सरकार येईल, किंबाहुना मध्यप्रदेश आणि राजस्थानची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात होईल, अशी आशा आघाडीच्या नेत्यांना आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी अशा मुद्दावर विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार पुनरागमन करताना सत्ता काबीज केली. तीनही राज्यात एकाचवेळी सत्ता मिळाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. परंतु, त्याचा फारसा उपयोग लोकसभा निवडणुकीत झाला नाही. जनतेचा कल राज्यात जरी काँग्रेसकडे असला तरी देशात मोदी सरकारवर विश्वास असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती राज्यात होईल, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत देखील हाच सूर होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भरभरून मते दिली. यावरून महाराष्ट्रातील जनतेने केंद्रीतील मोदी सरकारवर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले. मात्र राज्याच्या बाबतीत स्थिती वेगळी आहे. राज्यात मागील तीन वर्षात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आघाडी सरकावर विश्वास दाखवेल, असा विश्वास आघाडीला आहे.

दरम्यान असं झाल्यास विद्यामान सरकारला मोठा धोका आहे. भाजप-शिवसेना युतीचे राज्यात सरकार असून भाजप राज्यात सुसाट आहे. त्यामुळे राज्यात एवढ्या सहजतेने सत्तांतर होईल, याची शक्यता कमीच असल्याचे जाणकरांचे मत आहे.