शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

चर्चेसाठी आमचे अजूनही दरवाजे खुले: माधव भंडारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 6:01 PM

पुढे ही दोस्ती टिकेल याबाबाबत आमच्या मनात कुठेही शंका नाही.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटत असला तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही.भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात दोन्ही पक्षाकडून एकेमकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री पदावर शिवसेना अडली असून, भाजप मात्र यासाठी तयार नसल्याचे दिसत आहे. या दोन्ही पक्षातील संघर्ष वाढताना दिसत आहे. मात्र असे असले तरीही शिवसेनेसाठी भाजपचे अजूनही दरवाजे खुले असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा पाहिजे, म्हणून शिवसेना अडून बसली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील संघर्ष वाढताना दिसत आहे. मात्र यावर बोलताना माधव भंडारी म्हणाले की, विधानसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढवल्या आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे भावी मुख्यमंत्री असतील असे त्यावेळीच स्पष्ट करून आम्ही या निवडणूक लढवल्या आहेत.

तर दोन्ही पक्षातील सुरु असलेल्या वादावर बोलताना भंडारी म्हणाले की, चर्चा आमच्याकडून थांबलेली नसून, चर्चेसाठी आमचे दार कायम उघडे असतील. शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे. तसेच हिंदुत्ववादाच्या विचारांच्या आधारावर आम्ही दोन्ही एकत्र आलो आणि याच विचारधाऱ्याच्या विचाराणे आम्ही पुढे एकत्र काम करू आणि पुढे ही दोस्ती टिकेल याबाबाबत आमच्या मनात कुठेही शंका नाही. त्यामुळे चर्चेचे दरवाजे अजूनही खुले असल्याचे भंडारी म्हणाले.