शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

हप्ता साडेआठ लाख लोकांकडून, लाभ फक्त २१४ जणांनाच!, पंतप्रधानांच्या नावे असलेल्या विम्यातही लुबाडणूकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 11:41 IST

चक्क पंतप्रधानांच्या नावे असलेल्या ‘सुरक्षा विमा योजना’ व ‘जीवन ज्योती’ योजनेमध्ये बँका लोकांच्या खात्यातून दरवर्षाला हप्ता तर कपात करून घेतात, परंतु त्याचा लाभ फारसा कुणाला होत नसल्याचेच चित्र पुढे आले आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : चक्क पंतप्रधानांच्या नावे असलेल्या ‘सुरक्षा विमा योजना’ व ‘जीवन ज्योती’ योजनेमध्ये बँका लोकांच्या खात्यातून दरवर्षाला हप्ता तर कपात करून घेतात, परंतु त्याचा लाभ फारसा कुणाला होत नसल्याचेच चित्र पुढे आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात ८ लाख ४६ हजार २०६ लोकांच्या खात्यातून या योजनांसाठी हप्ता घेतला आहे, परंतु प्रत्यक्षात फक्त २१४ लोकांना विमा संरक्षणाची रक्कम मिळाली आहे.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मोठा गाजावाजा करून प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (पीएमएसबीवाय) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (पीएमजेजेबीवाय) सुरू करण्यात आल्या. सुरक्षा योजनेत १८ ते ७० वयोगटातील व्यक्तीच्या बँक खात्यातून वर्षाला १२ रुपये हप्त्यापोटी बँका कपात करून घेतात. त्याचा अपघाती मृत्यू किंवा शंभर टक्के अपंगत्व आल्यास २ लाख रुपये मिळतात. कमी अपंगत्व असल्यास १ लाख रुपये मिळतात.जीवन ज्योती योजनेत १८ ते ५० वयोगटातील व्यक्तीच्या खात्यातून वर्षाला ३३० रुपये कपात करून घेतले जातात. त्याचा मृत्यू झाल्यास त्यास २ लाख रुपये मिळतात. थेट देशाच्या पंतप्रधानांच्या नावे असलेल्या योजनेत पारदर्शीपणाचा कमालीचा अभाव आहे. कारण या दोन्ही योजनांचा लाभ किती लोकांना झाला, हेच कोणत्याही टप्प्यावर सांगितले जात नाही. प्रत्येक जिल्ह्यातील अग्रणी बँकेकडून किती लोकांचा विमा हप्ता बँकांनी कपात करून घेतला, याची माहिती आहे, परंतु त्याचवेळेला योजनेचा लाभ किती लोकांना मिळाला, याची माहिती उपलब्ध नाही.

कंपन्यांचे खिसे भरण्याचे काम...

  • बँका लोकांच्या खात्यातून प्रत्येकवर्षी ३१ मे रोजी या हप्त्याची रक्कम ॲटो डेबिटने कपात करून घेतात.
  • परंतु त्या ग्राहकाचा मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ देण्यासंदर्भात कोणतीच जबाबदारी घेत नाहीत.
  • कुणाचे निधन झाले हे आम्हाला कसे समजणार, अशी बँकांची भूमिका असते. त्यामुळे केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीचेच खिसे भरण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. 

कोल्हापुरातील चित्रयोजनेचे नाव                         सहभागी किती झाले?          लाभ किती जणांना मिळाला?

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना         ६ लाख १८ हजार ९७७             फक्त -२४प्रधानमंत्री जीवनज्योती योजना        २ लाख २७ हजार २२९             फक्त - १९०

या दोन्ही योजनांच्या हप्त्यापोटी एका वर्षात लोकांनी भरलेली रक्कम : ८ कोटी २४ लाख १३ हजार २९४

या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना मिळालेली रक्कम : ४ कोटी २८ लाख (सरासरी दोन लाख मिळाले असे गृहित धरून)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्य