शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

हप्ता साडेआठ लाख लोकांकडून, लाभ फक्त २१४ जणांनाच!, पंतप्रधानांच्या नावे असलेल्या विम्यातही लुबाडणूकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 11:41 IST

चक्क पंतप्रधानांच्या नावे असलेल्या ‘सुरक्षा विमा योजना’ व ‘जीवन ज्योती’ योजनेमध्ये बँका लोकांच्या खात्यातून दरवर्षाला हप्ता तर कपात करून घेतात, परंतु त्याचा लाभ फारसा कुणाला होत नसल्याचेच चित्र पुढे आले आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : चक्क पंतप्रधानांच्या नावे असलेल्या ‘सुरक्षा विमा योजना’ व ‘जीवन ज्योती’ योजनेमध्ये बँका लोकांच्या खात्यातून दरवर्षाला हप्ता तर कपात करून घेतात, परंतु त्याचा लाभ फारसा कुणाला होत नसल्याचेच चित्र पुढे आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात ८ लाख ४६ हजार २०६ लोकांच्या खात्यातून या योजनांसाठी हप्ता घेतला आहे, परंतु प्रत्यक्षात फक्त २१४ लोकांना विमा संरक्षणाची रक्कम मिळाली आहे.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मोठा गाजावाजा करून प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (पीएमएसबीवाय) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (पीएमजेजेबीवाय) सुरू करण्यात आल्या. सुरक्षा योजनेत १८ ते ७० वयोगटातील व्यक्तीच्या बँक खात्यातून वर्षाला १२ रुपये हप्त्यापोटी बँका कपात करून घेतात. त्याचा अपघाती मृत्यू किंवा शंभर टक्के अपंगत्व आल्यास २ लाख रुपये मिळतात. कमी अपंगत्व असल्यास १ लाख रुपये मिळतात.जीवन ज्योती योजनेत १८ ते ५० वयोगटातील व्यक्तीच्या खात्यातून वर्षाला ३३० रुपये कपात करून घेतले जातात. त्याचा मृत्यू झाल्यास त्यास २ लाख रुपये मिळतात. थेट देशाच्या पंतप्रधानांच्या नावे असलेल्या योजनेत पारदर्शीपणाचा कमालीचा अभाव आहे. कारण या दोन्ही योजनांचा लाभ किती लोकांना झाला, हेच कोणत्याही टप्प्यावर सांगितले जात नाही. प्रत्येक जिल्ह्यातील अग्रणी बँकेकडून किती लोकांचा विमा हप्ता बँकांनी कपात करून घेतला, याची माहिती आहे, परंतु त्याचवेळेला योजनेचा लाभ किती लोकांना मिळाला, याची माहिती उपलब्ध नाही.

कंपन्यांचे खिसे भरण्याचे काम...

  • बँका लोकांच्या खात्यातून प्रत्येकवर्षी ३१ मे रोजी या हप्त्याची रक्कम ॲटो डेबिटने कपात करून घेतात.
  • परंतु त्या ग्राहकाचा मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ देण्यासंदर्भात कोणतीच जबाबदारी घेत नाहीत.
  • कुणाचे निधन झाले हे आम्हाला कसे समजणार, अशी बँकांची भूमिका असते. त्यामुळे केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीचेच खिसे भरण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. 

कोल्हापुरातील चित्रयोजनेचे नाव                         सहभागी किती झाले?          लाभ किती जणांना मिळाला?

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना         ६ लाख १८ हजार ९७७             फक्त -२४प्रधानमंत्री जीवनज्योती योजना        २ लाख २७ हजार २२९             फक्त - १९०

या दोन्ही योजनांच्या हप्त्यापोटी एका वर्षात लोकांनी भरलेली रक्कम : ८ कोटी २४ लाख १३ हजार २९४

या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना मिळालेली रक्कम : ४ कोटी २८ लाख (सरासरी दोन लाख मिळाले असे गृहित धरून)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्य