शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

ऐन सुट्टीच्या हंगामात होतेय दुकानदारांकडून ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 5:24 AM

निरीक्षकांची ६७ पदे रिक्त : वैधमापन शास्त्र विभागाचा कारभार अधांतरी

जमीर काझी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उन्हाळी सुट्टीच्या हंगामात कुटुंबीयासमवेत फिरण्यास बाहेर पडलेल्या प्रवाशांची महामार्गावरील मॉल्स व हॉटेल्समधून राजरोस लूट सुरू आहे. तेथे बाटलीबंद पाणी आणि खाद्यपदार्थ अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांच्या माथ्यावर मारले जात आहेत. त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी कार्यरत वैद्यमापन शास्त्र विभागाचा कारभार अधिकाऱ्याविना केवळ कागदावरच कार्यरत राहिला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एका अधिकाºयाकडे तीन-तीन जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याने, त्यांची अवस्था ‘न घर का न घाट का’ अशी बनली आहे. कारण या विभागाकडील निरीक्षकाची २८८ पैकी तब्बल ६७ पदे अनेक वर्षांपासून रिक्तच आहेत, तर सहायक नियत्रकांची सध्या १५ पदे रिक्त असून, येत्या महिन्याअखेरीस त्यामध्ये आणखी दोघांची भर पडणार आहे.

अन्न व औषध विभागाच्या अखत्यारित कार्यरत असलेले वैधमापन शास्त्र विभागाची अपुºया मनुष्यबळामुळे दिवसेंदिवस बिकट अवस्था होत चालली आहे. खाद्यपदार्थाचे सीलबंद पॅकेट, बाटलीबंद पाणी व अन्य वस्तूच्या विक्री करणाºया आस्थापनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या विभागाचे असते. त्यासाठी महसूल वर्गाप्रमाणे त्याचे सात विभाग करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये नियंत्रकाचे (कंट्रोलर) पद हे अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयाकडे असून, त्यांच्यामार्फत पूर्ण विभागाचे नियंत्रण चालविले जाते. त्यांच्यानंतरची विभागवार सात उपनियंत्रककार्यरत असले, तरी प्रत्यक्षात ‘फिल्ड’वरची कामे करणाºया सहायक नियंत्रक व निरीक्षक पदाचा वानवा आहे. दोन्ही पदासाठीअनुक्रमे ४६ व २८८ पदे मंजूर असली, तरी सध्या केवळ ३१ व २११ पदे पूर्ण राज्यात कार्यरत असल्याची माहिती विभागातील सूत्रांकडून देण्यात आली.

दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १५ व ६७ पदे रिक्त असून, अधिकाऱ्यांच्या निवृत्तीप्रमाणे दरवर्षी त्यामध्ये वृद्धी होत राहिली आहे. त्यामुळे एका-एका अधिकाºयाकडे नियमित पदाशिवाय अन्य दोन-दोन, तीन-तीन ठिकाणांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.अशी चालते ग्राहकांची लुटमारसुट्टीच्या हंगामामुळे महामार्गावरील हॉटेल्स, दुकानाच्या ठिकाणी ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. या ठिकाणी १४ रुपयांची पाण्याची बाटली १८ ते २० रुपयांना विकली जात आहे. शीतपेय आणि फूड पॅकेट्सही छापील किमतीपेक्षा सरासरी ४ ते ८ रुपये अधिक दराने विकले जात आहेत. दराच्या तफावतीबाबत दुकानचालकाकडे विचारणा केल्यास, ‘या दरात तुम्हाला घ्यायची असेल, तर घ्या किंवा घेऊ नका,’ असे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना गरजेपोटी जादा दराने वस्तू खरेदी करावे लागते. काही मॉल्स व हॉटेलच्या परिसरात वैधमापन विभागाकडून वस्तू विक्रीबाबतचे फलक लावले असून, तक्रारीसाठी संपर्क क्रमांक दिला आहे. मात्र, त्या क्रमांकावर कॉल केल्यानंतर कार्यवाही तर दूरच काहीच प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे विनाकारण वेळ वाया जात असल्याने नागरिकही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची परिस्थिती आहे.पाण्डेय, सानप यांच्या कारवाईचे स्मरणवैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकाने जर मनात आणले, तर लुटमार करणाºया अस्थापनावर वचक बसतो. साडेतीन, चार वर्षांपासून तत्कालीन नियंत्रक संजय पाण्डये यांनी नियमांची पायमल्ली करणाºयावर कारवाई करून, बेशिस्त मॉल, शॉपवर वचक बसविला. त्यांच्यापूर्वी डॉ. माधवराव सानप यांनी नियमबाह्य अस्थापनावर कारवाईचा बडगा उगारला होता. ग्राहकांना आता त्यांच्या कारकिर्दीचे स्मरण होत आहे.