शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 12:16 IST

Loksabha Election - कल्याणच्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लीम समुदायाला आवाहन करत उद्धव ठाकरेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

कल्याण - Prakash Ambedkar on Muslim ( Marathi News ) काही पक्ष तुम्हाला मर्यादेपर्यंत साथ देतील पण १०० टक्के साथ हवी असेल तर एक मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कल्याणच्या सभेत केले. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उबाठा सेना मुस्लिमांना उमेदवारी देणार नाही, नेतृत्व देणार नाही, पण मुस्लिमांची मते घेऊन त्यानंतर पुढे काहीही करतील. NRC आणि CAA हे संविधानाच्या विरोधात असून त्याविरोधात आवाज उचला. भाजपाला हरवायचं यात दुमत नाही मग तुम्ही ठरवलं तर मोहम्मद शहाबुद्दीनही हरवू शकतात. निवडून आल्यानंतर तुमच्याशी प्रामाणिक राहील याची गॅरंटी नाही त्याच्यावर विश्वास का ठेवायचा?, आगीशी का खेळताय, आम्ही तुम्हाला आधीच सूचित करतोय असं त्यांनी सांगितले. 

तसेच जोपर्यंत तुम्ही तुमच्या उमेदवाराला मतदान द्यायला शिकणार नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याकडे नेतृत्व मागू शकत नाही. मुस्लीम उमेदवार असून तुम्ही मतदान का केले नाही याचे उत्तर तुम्हाला पुढे द्यावे लागेल. मुस्लिमांना मत देणार नाही अशी परिस्थिती मुस्लीम मतदारांनी करू नये. तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारू नका. जर तुम्ही मोहम्मद शहाबुद्दीन यांना मतदान केले नाही तर तुम्ही मुस्लीम उमेदवार नसतानाही आम्हाला मते मिळू शकतात असं त्यांना वाटेल. माझं मुस्लीम मतदारांना आवाहन आहे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. 

दरम्यान, या देशाला मोदी हिंदूराष्ट्र करायला निघालेत. मात्र याच मोदींच्या काळात २०१४ ते राज्यसभेत प्रश्नाचं उत्तर येईपर्यंत १७ लाख कुटुंबाने फक्त देश सोडला नाही तर नागरिकत्व सोडले. वसुलीचं राज्य सुरू होते. जेलमध्ये टाका, आयकर खात्यात अडकवा. या कारवायातून हे लोक भारतीय नागरिकत्व सोडून बाहेर गेले. १७ लाख कुटुंबाला देशातून घालवणारा भाजपा चालतो का? हे सरकार कुणाच्या विरोधात होते, तर १७ लाख कुटुंब ज्यांनी देश सोडला ते हिंदूच होते. या कुटुंबावर धाडी टाकणार होता, ईडीच्या नोटीस देणार होतात. जर त्यांनी देणगी दिली नाही तर त्यांना अडचणीत आणणार होते. या देशाचा आर्थिक कणा मजबूत ठेवायचा असेल तर भाजपाविरोधात मतदान केले पाहिजे असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMuslimमुस्लीमVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीkalyan-pcकल्याणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४