शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 14:09 IST

loksabha Election - येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील, काहीजण विलीनीकरण करतील असं विधान शरद पवारांनी केले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

पुणे - Prithviraj Chavan on Sharad Pawar ( Marathi News ) राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यावर आत्ताच काही सांगता येणार नाही. जे काही होईल ते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल असं मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मांडले आहे.

प्रादेशिक पक्षांबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शरद पवारांनी ही मुलाखत सातारला दिली, सातारच्या सांगता सभेनंतर दिलेल्या या मुलाखतीत मीदेखील तिथे होतो. शरद पवारांनी मांडलेले मत हे त्यांचे व्यक्तिगत आहे. त्यांनी २ गोष्टी मांडल्या, त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारधारेत फरक नाही. सहकाऱ्यांना विचारून निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं. काँग्रेसमध्ये विलीन होईल का यावर त्यांनी नकार दिलेला नाही. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील, काही विलीन होतील असंही ते बोलले. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ते अवलंबून असेल असं मला वाटते. जर इंडिया आघाडीची सत्ता आली तर शरद पवार म्हणतायेत तसं होईल. सत्तेचा लाभ मिळवण्यासाठी काँग्रेससोबत अनेकजण येतील. पण विरोधात निकाल लागला तर मग तसे होणार नाही, भाजपासोबत जाण्याची प्रवृत्ती दिसेल वाटते असं त्यांनी सांगितले.

तसेच शरद पवारांच्या पक्षाचं विलीनीकरण हा त्यांचा निर्णय आहे. त्यावर मला सांगता येत नाही. निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जे काही असेल ते स्पष्ट होईल. ही निवडणूक बहुतांश १९७७ सारखी आहे. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना पराभूत करण्यासाठी अनेक लहान मोठे पक्ष एकत्र आले होते. आजही तीच परिस्थिती आहे. तेव्हाही पंतप्रधानपदाचा चेहरा पुढे आणला नव्हता. इंडिया आघाडीचं सरकार आले तर खासदार बसून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण हे ठरवतील असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं बहुमत येईल. महायुतीपेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील. निश्चित किती जागा येतील ते पाचही टप्पे झाल्यावर सांगता येईल. नरेंद्र मोदींच्या व्यक्तिगत विरोधात सुप्त लाट आहे. मोदींनी अर्थव्यवस्था योग्य प्रमाणे न हाताळल्याने महागाई, बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांमध्येही नाराजी आहे. निवडणूक रोखेचा भ्रष्टाचार उघड झाला. साम, दाम दंड भेद वापरून निवडून आलेली सरकारे पाडली. पैशाचा घोडेबाजार झाला, त्यावर लोक नाराज आहेत. त्यामुळे आमदार, नेते तिथे गेले असले तरी जनता त्यांच्यासोबत गेलीय का हे ४ जूनला आपल्याला कळेल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदेच्या काँग्रेस प्रवेशावर म्हणाले...

२०१३ साली एकनाथ शिंदे ४-५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते, असा दावा राजन विचारेंनी केला होता. त्यावर एकनाथ शिंदेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत मला काही माहिती नाही. २०१४ च्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असावी. परंतु माझ्यापर्यंत हा विषय कधी आला नाही असं पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४