शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विधिमंडळात काम करण्यास प्रोत्साहन मिळेल असा ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 21:44 IST

विधिमंडळात काम करण्यास प्रोत्साहन मिळेल असा ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ आहे, यासाठी मी लोकमतचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. विधानमंडळात उत्कृष्ट काम करणा-या सदस्यांचा गौरव करण्याचा निर्णय लोकमतने घेतला आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

नागपूर :  विधिमंडळात काम करण्यास प्रोत्साहन मिळेल असा ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ आहे, यासाठी मी लोकमतचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. विधानमंडळात उत्कृष्ट काम करणा-या सदस्यांचा गौरव करण्याचा निर्णय लोकमतने घेतला आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळा नागपुरात मोठ्या उत्साह पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या सोहळ्यात मंचावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, प्रसिद्ध विधिज्ज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. या विजेत्यांची कामे मी जवळून पाहिली आहेत. विद्याताई चव्हाण यांनी पोटतिडिकीने सामान्य माणसांचे प्रश्न सभागृहात मांडले आहेत. यशोमतीताईंनीही उत्कृष्ट कामगिरी केली. अनिल सोले प्रथमच विधानपरिषदेत निवडून गेल्यावर त्यांनी उत्तम काम केले. तर, सुनील प्रभू मुंबईचे महापौर राहिले आहेत. विधानसभेचे प्रतोद म्हणून काम करीत आहेत. सरकारची बाजू सांभाळात योग्य प्रकारची भूमिका ठेवत असतात. याचबरोबर, संजय दत्त कुठल्याही प्रश्नावर अभ्यासू मत मांडत असतात. त्यांचा प्रश्न असला की मी उत्तराला येतो असा माझ्यावर आरोप आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मैत्री असणे चुकीचे नाही. पण खाजगीत आम्ही शत्रू नाही. हस्तांदोलन करता येते. एका टेबलवर बसून जेवताही येते. हे राजकारणात महत्वाचे आहे. गेल्या साडेतीन वर्षात विखे पाटील माझ्याकडे कधीही वैयक्तिक कामाकरिता आले नाही किंवा कोणाच्याही वैयक्तिक कामाकरीता आले नाहीत. पक्षाच्या संदर्भातील कामे घेऊन आले. ही लोकशाहीची सुदृढता आहे ती आज संपते आहे, ती संपू नये असे प्रयत्न आपण केले पाहिजेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

सामंजस्य याचा अर्थ फिक्सिंग असा होत नाही. लोकशाहीत सुई पडली तरी आवाज येतो. फिक्सिंग असेल तर ते १०० टक्के समजते. हा अजेंडा ठरवण्याची जबाबदारी मिडियाची आहे. कारण तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आम्हाला सुधरवण्याची जी ताकद राजेंद्रबाबू तुमच्यात आहे, ती दुस-या कुणात नाही. आपण सगळे लोकशाहीचे स्तंभ म्हणून जे काम करतो ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करू. शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. त्याचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. लोकशाहीत निष्पक्ष काम करणा-यांचा आज आपण पुरस्कार करतो आहे. चांगल्याचा पुरस्कार करण्याचा निर्णय घेतल्याने सर्व सभासदांना असे वाटेल, की लोकमतचा पुढचा पुरस्कार आम्हाला मिळावा, त्यातून योग्य कामाची एक प्रेरणा त्यांना मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

या सोहळ्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गौरवास्पद कामगिरी करणारे विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याचबरोबर, सुनील प्रभू यांचा उत्कृष्ट नवोदित आमदार(विधानसभा), अनिल सोले यांचा उत्कृष्ट नवोदित आमदार (विधानपरिषद),  श्रीमती यशोमती ठाकूर यांचा उत्कृष्ट महिला आमदार (विधानसभा), श्रीमती विद्या चव्हाण यांचा उत्कृष्ट महिला आमदार (विधानपरिषद), आशिष शेलार यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानसभा) आणि संजय दत्त यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानपरिषद) म्हणून सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :Lokmat Vidhi Mandal Purskarलोकमत विधिमंडळ पुरस्कारnagpurनागपूर