‘लोकमत’तर्फे शांततेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 06:41 AM2019-11-09T06:41:08+5:302019-11-09T06:41:16+5:30

अयोध्या प्रकरणात आज निकाल जाहीर होणार आहे

Lokmat calls for peace after ayodhya verdict | ‘लोकमत’तर्फे शांततेचे आवाहन

‘लोकमत’तर्फे शांततेचे आवाहन

Next

अयोध्या प्रकरणात आज निकाल जाहीर होणार आहे. सन्माननीय सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल तो आपण स्वीकारून त्याचा आदर राखुया. शांततेचे, सौहार्दाचे, बंधुभावाचे व सामंजस्याचे वातावरण बिघडणार नाही, याची दक्षता घेऊया. कोणीही अफवा पसरवू नयेत व कोणत्याही अफवांना बळी पडू नये. सर्वांनीच सोशल मीडियाचा वापर करताना तारतम्य बाळगावे आणि संयम राखावा. आपल्या समंजसपणाच्या परीक्षेचे हे दिवस आहेत, त्यात आपण उत्तीर्ण होऊया. देशातील शांतता व सद्भावना कायम राहील आणि कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन केले जाईल, यासाठी आपण सारे कटिबद्ध राहूया.

- लोकमत माध्यम समूह

Web Title: Lokmat calls for peace after ayodhya verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.