शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लोकमंगल प्रकरण सुभाष देशमुखांच्या उमेदवारीसाठी ठरू शकते अडचणीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 12:47 IST

पक्षाची उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे.

मुंबई - दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना लोकमंगल खत प्रकरणाममुळे आगामी निवडणुकीत फटका बसण्याची चर्चा मतदारसंघ व भाजप पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. तर लोकमंगल खत प्रकरणाममुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी सुद्धा त्यांच्यासाठी अडचण ठरणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. निवडणुकीत या मुद्द्यावरून विरोधक प्रचार करण्याची शक्यता असल्याने त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुका येत्या दोन दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाची उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. त्याचप्रमाणे दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सुद्धा पुन्हा पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र असे असले तरीही भाजप पक्षातील उमेदवारी देण्याचा निर्णय थेट अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असणार आहे.

मात्र नुकतेच गाजलेले लोकमंगल खत पुरवठा प्रकरणामुळे भाजपवर मोठ्याप्रमाणावर टीका होताना पाहायला मिळाले होते. तर विरोधकांनी यावरूनच सरकारवर जोरदार हल्ला केला होता. तर लोकमंगल बायोटेक कंपनीच्या संचालक मंडळावर मी नाही. त्यामुळे या प्रकरणाचा आपल्याशी संबंध नसल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुभाष देशमुख जरी थेट संचालक मंडळावर नसले तरी त्यांचे नातेवाईक किंवा सहकारीच लोकमंगलच्या संचलाकपदी असल्याचे स्पष्ट झाले होते.

तर निवडणुकीत  विरोधकांकडून याच मुद्यावरून सरकारवर टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशमुख यांना उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक नसल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यातच हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला जाणार असल्याच्या चर्चा सुद्धा पाहायला मिळत असल्याने, देशमुख यांची डोकेदुखी वाढली आहे.