शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

लोकसभा निवडणुकीपूर्वीच युतीचा फॉर्म्युला ठरलेला: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 18:13 IST

गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत समान वाटपाच्या निर्णयानंतरही दोन्ही पक्ष वेगळे लढले होत.

मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघ्या दोन महिन्यांचा काळ शिल्लक राहिला असून, सेना-भाजप युतीचा निर्णय तळ्यात मळ्यात सुरु असल्याचे दिसत आहे. मात्र युतीचा फॉर्म्युला हा लोकसभा निवडणुकीच्या आधीच ठरला असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सत्ता आणि उमेदवारीच्या जागांमध्ये  समान वाटप असा हा फॉर्म्युला ठरला असून, दोन्ही पक्ष यावर कायम असल्याचा दावा सुद्धा राऊत यांनी केला. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा युती होणार असल्याचा दावा दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून होताना दिसत आहे. परंतु जागावाटपाचा आकडा अजूनही ठरला नसल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे युतीचा फॉर्म्युला आधीच ठरलेला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. सत्तेत आणि जागावाटपात समान वाटप असा फॉर्म्युला भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर असतानाच ठरला असल्याचे राऊत म्हणाले. विशेष म्हणजे हा फॉर्म्युला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आला असल्याचा दावा सुद्धा राऊत यांनी केला आहे.

गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत समान वाटपाच्या निर्णयानंतरही दोन्ही पक्ष वेगळे लढले होत. मात्र यावेळी असे होणार नाही. आता भाजप-शिवसेनेत कोणतेही वाद नसून, दोन्ही पक्षाने एकत्र राहण्याचे ठरवले असल्याचे राऊत म्हणाले. आता आमचं पण ठरलं अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत युतीचा समान वाटपाचा निर्णय झाला असल्याचा राऊत यांच्या दाव्याशी भाजप सहमत होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.