शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शरद पवारांनी आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कधीच वाटेल ते मार्ग स्वीकारले नाहीत - आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 15:42 IST

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यापासून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांवर झालेल्या प्रत्येक टीकेला उत्तर देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. आता त्यांनी प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या एका विधानाचा दाखला देत विरोधकांना डिवचले आहे. १९९६ मध्ये शरद पवार पंतप्रधान झाले असते पण काँग्रेसमुळे ते होऊ शकले नाही, असे पटेल यांनी सांगितले. यावर शरद पवारांनी आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कधीच वाटेल ते मार्ग स्वीकारले नाहीत, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, १९९६ मध्ये देवेगौडा सरकारमध्ये असताना आणि सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी १० महिन्यांच्या आत सरकारमधून आपला पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी देवेगौडा यांनीच मला पवार साहेबांना काँग्रेसचे नेतृत्व करण्यास सांगा, मी राजीनामा देऊन त्यांना पाठिंबा देईन असे सांगितले होते. त्यावेळी काँग्रेस पक्षातील सर्व नेते सीताराम केसरी यांच्यावर नाराज होते आणि त्यावेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली असती तर कदाचित पवार साहेब पंतप्रधान झाले असते.

पटेल यांच्या विधानाचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता एक बोलकी पोस्ट केली. त्यांनी सांगितले की, शरद पवार साहेब यांनी १९९६ साली संकोच केला. अन्यथा,  ते त्याचवेळेस पंतप्रधान झाले असते, असे महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याचे म्हणणे आहे. याचाच अर्थ आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांनी कधीच वाटेल ते मार्ग स्वीकारले नाहीत अन् स्वीकारणारही नाहीत. ते संकोच करू शकतात. पण, ते सत्तापिपासू नाहीत.

बुधवारी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत मोठा खुलासा करत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, २ जुलै २०२३ रोजी अजित पवार आणि आमच्या मंत्र्यांनी आताच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर १५-१६ जुलै रोजी मुंबईत शरद पवार यांची दोनदा भेट घेऊन त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि आमच्यासोबत येण्याची त्यांना विनंती केली. आम्हाला तुमच्या नेतृत्वाखालीच काम करायचे आहे, असेही आम्ही त्यांना सांगितले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार