शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

...तर भाजपने नथुराम गोडसेला ही तिकीट दिले असतं : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 15:16 IST

भाजप बेशरमपणे अशा व्यक्तीचे समर्थन करत आहे, जी व्यक्ती दहशतवाद आणि राष्ट्रविरोधी कारवायात सामील आहे. जवानांच्या बलिदानावर मतदान मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रज्ञा सिंहच्या वक्तव्यावर, जनतेची माफी मागावी वाटली नाही, अस सावंत यांनी नमूद केले.

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट आली होती. आता काँग्रेसने देखील भाजपवर प्रज्ञा सिंह यांना दिलेल्या उमेदवारीवरून कडाडून टीका केली आहे. महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे जिवंत असते, तर त्यांना देखील भाजपने तिकीट दिले असते, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

जामिनावर सुटलेल्या प्रज्ञा सिंह यांनी २६/११ हल्ल्यात शहिद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी दिलेल्या श्रापामुळेच त्यांचा सर्वनाश झाल्याचा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता. आपल्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केल्यामुळेच आपण करकरेंना श्राप दिला होता, असंही त्यांनी म्हटले होते. विषेश म्हणजे, भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. त्यानंतर भाजपकडून प्रज्ञा सिंह यांचे समर्थन देखील करण्यात आले. यामुळे प्रज्ञा सिंह यांचे वक्तव्य भाजपच्या हिंदू कार्ड चालवण्यामागची योजना तर नव्हती ना, अशी शंकाही उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले की, भाजप बेशरमपणे अशा व्यक्तीचे समर्थन करत आहे, जी व्यक्ती दहशतवाद आणि राष्ट्रविरोधी कारवायात सामील आहे. जवानांच्या बलिदानावर मतदान मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रज्ञा सिंहच्या वक्तव्यावर, जनतेची माफी मागावी वाटली नाही, असंही सावंत यांनी नमूद केले. तसेच एवढा विरोध झाल्यानंतरही प्रज्ञा सिंह यांची उमेदवारी कायम राखल्यामुळे भाजपकडून दहशतवादाचे समर्थन करण्यात येत असल्याचे स्पष्ट होते, असा टोलाही सावंत यांनी लागवला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस