शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 08:35 IST

Loksabha Election - शरद पवारांनी वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीवरून अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान केले, त्यावर अजित पवारांनी भाष्य केले आहे. 

पुणे - Ajit Pawar on Sharad pawar ( Marathi News ) शरद पवारांच्या मनात असते, तोच निर्णय ते घेत असतात, ते कुणाचं ऐकत नाही. त्यांना हवं तसं ते करतात असं सांगत अजित पवारांनीशरद पवारांच्या विधानावर टोला लगावला आहे. पक्षाच्या विलीनीकरणाबाबत पवारांनी सामुहिकरित्या निर्णय होईल असं म्हटलं होते. त्यावर अजित पवारांनी हे भाष्य केले. 

पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, मी फार जवळून शरद पवारांसोबत काम केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत मला माहिती आहे. संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार अनेकदा विधाने करतात. उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील वाटत नाही. मी त्यांचे काम पाहिले आहे. त्यांचा स्वभाव पाहिला आहे ते बघता ते पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतील असं वाटत नाही. शरद पवारांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात, तो सामुहिक निर्णय आहे असं दाखवतात असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा ते एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते. शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो निर्णय सामुहिक आणि चर्चा केल्यासारखं दाखवतात. परंतु त्यांच्या मनात असते तेच ठामपणे करतात. शरद पवार कुणाचं ऐकत नाही, ते हवं तसं ते करत असतात. तो त्यांचा स्वभाव आहे. तो बदलणं शक्य नाही असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, निलेश लंके याने पक्ष सोडला, पण पुन्हा त्याला पक्षात घेतले, त्यामुळे शरद पवार सांगतात, त्यात काहीही तथ्य नसते. राजकारणात कुणी कुणाचं कायमचं शत्रू आणि विरोधक नसते. संभ्रमावस्था, लोकांमध्ये संशय कल्लोळ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पुलोदच्या वेळी जनता पक्षाचे १०० पेक्षा जास्त आमदार आले होते. ४० आमदार घेऊन शरद पवार बाहेर पडले, जनता पक्षाच्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार स्थापन केले. आताही एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन बाहेर पडले, भाजपासोबत सरकार स्थापन केले. ती आणि आत्ताची घटना सारखीच आहे असंही अजित पवारांनी म्हटलं. 

ते धादांत खोटे....

अमित शाह महाराष्ट्राचं राजकारण चालवतायेत हे धादांत खोटे आहे. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका एकत्र बसून घेतो. कुणाच्या सांगण्याने राजकारण करणारी आम्ही नव्हे अशी स्पष्ट भूमिका अजित पवारांनी घेतली. 

रोहित पवारांचं मानसिक संतुलन बिघडलं

रोहित पवारांकडून सातत्याने अजित पवारांविरोधात विधाने येत आहेत. त्यावर अजित पवारांनी रोहितचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे अलीकडे तो काहीही बडबडायला लागलाय असं सांगून त्यांची खिल्ली उडवली. 

कोल्हे ५ वर्ष गायब, आढळराव लोकांच्या संपर्कात 

जर शिवाजी आढळरावांचं काम नसतं, तर ते तिनदा निवडून आले नसते. चौथ्यांदा थोडक्या मतांनी पडले. ५ वर्षाचा अमोल कोल्हेंचा कार्यकाळ आणि आढळरावांचा कार्यकाळ तुलना करा. गेल्या ५ वर्षात आढळरावांनी चांगला जनसंपर्क ठेवला. मात्र निवडून आलेले खासदार राजीनामा द्यायला निघाले होते. लोकांना ५ वर्ष भेटलेच नाही. शिवाजी आढळराव पाटील कामाचा माणूस असून पराभूत होऊनही ते लोकांमध्ये संपर्कात होते. महायुतीच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील कामांसाठी धडपड केली असं अजित पवारांनी सांगितले.  

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४