शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 08:35 IST

Loksabha Election - शरद पवारांनी वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीवरून अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान केले, त्यावर अजित पवारांनी भाष्य केले आहे. 

पुणे - Ajit Pawar on Sharad pawar ( Marathi News ) शरद पवारांच्या मनात असते, तोच निर्णय ते घेत असतात, ते कुणाचं ऐकत नाही. त्यांना हवं तसं ते करतात असं सांगत अजित पवारांनीशरद पवारांच्या विधानावर टोला लगावला आहे. पक्षाच्या विलीनीकरणाबाबत पवारांनी सामुहिकरित्या निर्णय होईल असं म्हटलं होते. त्यावर अजित पवारांनी हे भाष्य केले. 

पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, मी फार जवळून शरद पवारांसोबत काम केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत मला माहिती आहे. संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार अनेकदा विधाने करतात. उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील वाटत नाही. मी त्यांचे काम पाहिले आहे. त्यांचा स्वभाव पाहिला आहे ते बघता ते पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतील असं वाटत नाही. शरद पवारांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात, तो सामुहिक निर्णय आहे असं दाखवतात असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा ते एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते. शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो निर्णय सामुहिक आणि चर्चा केल्यासारखं दाखवतात. परंतु त्यांच्या मनात असते तेच ठामपणे करतात. शरद पवार कुणाचं ऐकत नाही, ते हवं तसं ते करत असतात. तो त्यांचा स्वभाव आहे. तो बदलणं शक्य नाही असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, निलेश लंके याने पक्ष सोडला, पण पुन्हा त्याला पक्षात घेतले, त्यामुळे शरद पवार सांगतात, त्यात काहीही तथ्य नसते. राजकारणात कुणी कुणाचं कायमचं शत्रू आणि विरोधक नसते. संभ्रमावस्था, लोकांमध्ये संशय कल्लोळ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पुलोदच्या वेळी जनता पक्षाचे १०० पेक्षा जास्त आमदार आले होते. ४० आमदार घेऊन शरद पवार बाहेर पडले, जनता पक्षाच्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार स्थापन केले. आताही एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन बाहेर पडले, भाजपासोबत सरकार स्थापन केले. ती आणि आत्ताची घटना सारखीच आहे असंही अजित पवारांनी म्हटलं. 

ते धादांत खोटे....

अमित शाह महाराष्ट्राचं राजकारण चालवतायेत हे धादांत खोटे आहे. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका एकत्र बसून घेतो. कुणाच्या सांगण्याने राजकारण करणारी आम्ही नव्हे अशी स्पष्ट भूमिका अजित पवारांनी घेतली. 

रोहित पवारांचं मानसिक संतुलन बिघडलं

रोहित पवारांकडून सातत्याने अजित पवारांविरोधात विधाने येत आहेत. त्यावर अजित पवारांनी रोहितचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे अलीकडे तो काहीही बडबडायला लागलाय असं सांगून त्यांची खिल्ली उडवली. 

कोल्हे ५ वर्ष गायब, आढळराव लोकांच्या संपर्कात 

जर शिवाजी आढळरावांचं काम नसतं, तर ते तिनदा निवडून आले नसते. चौथ्यांदा थोडक्या मतांनी पडले. ५ वर्षाचा अमोल कोल्हेंचा कार्यकाळ आणि आढळरावांचा कार्यकाळ तुलना करा. गेल्या ५ वर्षात आढळरावांनी चांगला जनसंपर्क ठेवला. मात्र निवडून आलेले खासदार राजीनामा द्यायला निघाले होते. लोकांना ५ वर्ष भेटलेच नाही. शिवाजी आढळराव पाटील कामाचा माणूस असून पराभूत होऊनही ते लोकांमध्ये संपर्कात होते. महायुतीच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील कामांसाठी धडपड केली असं अजित पवारांनी सांगितले.  

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४