शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपेक्षित निकाल नाही, पण लोकांचा कौल मान्य - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 3:06 PM

अनेक ठिकाणी आम्ही खूप कमी मतदानाने पराभूत झालो आहोत. याचा गांभीर्याने अभ्यास करणार आहोत

पुणे - लोकसभा निवडणुकीचा निकाल आम्हाला अपेक्षित होता पण तसा निकाल आला नाही. लोकांनी जे मतदान केलं त्यांचे आभार मानतो, कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्यांचे धन्यवाद देतो. लोकांचा निर्णय मान्य आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मागील निवडणुकीत जे यश भाजपाला मिळालं होतं त्यामधील मताधिक्य यंदाच्या निवडणुकीत कमी झालं आहे. निकालांची चिंता न बाळगता दुष्काळग्रस्त भागात जाऊन लोकांना मदत करण्याची भूमिका आहे. अनेक ठिकाणी आम्ही खूप कमी मतदानाने पराभूत झालो आहोत. याचा गांभीर्याने अभ्यास करणार आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच  महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संपर्क ठेऊन जनाधार वाढविण्यासाठी माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्न करतील. रायगड, बारामती, शिरुर, सातारा या चार मतदारसंघात राष्ट्रवादी विजयी झालेली आहेत. अमरावती आणि माढ्यात अटीतटीची लढत आहे त्याचं चित्र स्पष्ट होईल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.  

दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने कधी जिंकला नव्हता. तिथे पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही करु शकलो असं भाष्य पार्थ पवार यांच्या पराभवावर शरद पवारांनी दिली. तसेच मी निवडणूक लढवणार नव्हतो हे 2014 साली ठरवलं होतं. मी राज्यसभेचा सदस्य होतो. माढ्यातील पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नव्हती म्हणून मी तुमच्यात एकवाक्यता नसेल तर मी लढतो असं बोललो होतो असं पवारांनी स्पष्ट केलं. 

राज ठाकरे यांच्या सभांचा किती फायदा झाला यावर बोलताना शरद पवारांनी यावर बोलणं टाळलं. मनसेने उमेदवार उभे केले नव्हते, जर त्यांनी लोकसभेत उमेदवार उभे केले असते तर बहुदा चित्र वेगळं दिसलं असतं असा अंदाज पवारांनी दिला. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, शिरुर, सातारा, रायगड हे मतदारसंघ ताब्यात मिळविले आहेत. अजूनही काही मतदारसंघात मतमोजणी सुरु आहे. त्याठिकाणीही काही जागांवर विजय मिळू शकतो अशी शक्यता शरद पवारांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा