शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 18:48 IST

एकनाथ खडसे यांनी भाजपला चिंतन करण्याची गरज असल्याचे म्हणताच मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे

Eknath Khadse VS Girish Mahajan : लोकसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून अनेक निष्कर्षांमधून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असे अंदाज वर्तवण्यात आलाय. मात्र पंतप्रधान मोदींनी दिलेली ४०० पारची घोषणा पूर्ण होणार की नाही याबाबत अनेकांना शंका आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केलं जात आहे. एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात भाजपच्या विजयाबाबत चित्र काहीसे स्पष्ट झालेलं नाही. अशातच एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन भाजप प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या एकनाथ खडसे यांनी पक्षालाच कानपिचक्या दिल्या होत्या. भाजपाला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसल्याचं विधान एकनाथ खडसेंनी केलं होतं. त्यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना रोखठोक सवाल केला आहे.

एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. खडसे यांचा अधिकृत प्रवेश झाला नसला तरी लोकसभा निवडणुकीत भाजपचे समर्थन करत होते. यावेळी भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसला आहे का? असा सवाल एकनाथ खडसे यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना खडसे यांनी भाजपला चिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. याबाबत आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर बोलण्याआधी खडसेंनी त्यांचा पक्ष कोणता हे सांगावे असे प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत टीव्ही९ मराठीसोबत बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपला चिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटलं. "भारतीय जनता पक्ष ज्यांनी रात्रंदिवस काम करून उभा केला, त्यांचा हा पक्ष असताना इतराच्या हातामध्ये जाणं आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा हा परिणाम आहे. हे जनतेला वाटलं. त्यामुळे अजित पवार यांना या निवडणुकीत फार प्रतिसाद दिसत नाही. तसेच शिवसेना शिंदे गटालाही जास्त प्रतिसाद दिसत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला चिंता करण्याची गरज आहे,” असे एकनाथ खडसे म्हणाले होते.

गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

"त्यांना म्हणा तुम्ही आमची चिंता करु नका. तुम्ही नेमकं कोणत्या पक्षात आहात आधी ते सांगा आणि मग बोला," अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी  एकनाथ खडसेंच्या विधानावर दिली आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Girish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपा