शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 13:09 IST

Loksabha Election - काही मूठभर लोक मोदी गेले पाहिजेत अशी विधाने करतात, २०१४, २०१९ लाही त्यांनी अशीच टीका केली होती. मात्र जनता मोदींसोबत आहे असं विधान एकनाथ शिंदेंनी केले आहे. 

मुंबई - Eknath Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) उद्धव ठाकरे कोत्या मनोवृत्तीचे, उबाठानं काँग्रेससोबत लोटांगण घातलं. ते लीन झालेत आणि विलीनकरण बाकी आहे. झोपता उठता, शिव्याश्राप देणारे त्यांच्यासोबत जाणार ही चर्चा निरर्थक आहे असं सांगत एकनाथ शिंदेंनीउद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, भगवा झेंडा बाळासाहेबांना जीव की प्राण होता, आज त्याच भगव्याशी प्रतारणा उद्धव ठाकरे करतायेत. भगव्याची एलर्जी त्यांना दिसते, हिंदुत्व सोडले आहे. श्रीकांतवरील एवढ्या खालच्या पातळीवरील टीका ऐकून खंत वाटते. परंतु समोरून अपेक्षा काय करणार? जे बाळासाहेब ठाकरेंना विसरले. त्यांचे विचार सोडले. उद्धव ठाकरेंचे संतुलन बिघडले आहे. लोकांसोबत २ वेळा विश्वासघात केलाय. जनतेसोबत, युतीसोबत आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत विश्वासघात केलाय. फक्त खुर्चीसाठी महाबेईमानी त्यांनी केली असा आरोप त्यांनी केला. झी २४ तासच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच मी संपूर्ण राज्यात फिरलो, काही मूठभर लोकांना मोदींबाबत एलर्जी आणि द्वेष आहेत. मोदी गेलेच पाहिजे असं त्यांचे म्हणणं आहे. परंतु मूठभर लोकांनी म्हणून काय होते, जनता मोदींसोबत आहेत. मौत का सौदागर, चौकीदार चोर है असे विविध आरोप विरोधकांनी याआधीही केले. आता तडीपार करणार, गाडून टाकणार अशी भाषा वापरली जाते. लाखो जनता आज मोदींसोबत आहेत. जेवढे विरोध करतात तेवढे लोक मोदींना मत करण्यासाठी पुढे येतात असा टोलाही एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला. 

दरम्यान, मराठीचा सन्मान राखलाच पाहिजे, त्यासाठी तडजोड होणार नाही. सरकार म्हणून काम करताना या राज्यातील प्रत्येकाला हे सरकार माझे आहे, त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे. उद्योजक असो वा शेतकरी, कामगार. मागील काळात उद्योजकांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवायला लागले ते कसे सुरक्षित राहणार? मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करायच्या असतील तर उद्योग धंदे आले पाहिजेत. त्यासाठी हे सरकार काम करतंय. वेदांता गेला, तेव्हा आमच्या सरकारला २ महिनेच झाले होते. २ महिन्यात उद्योग जात नाही. आधीच्या सरकारने स्वार्थासाठी अनेक गोष्टीची मागणी केली त्यामुळे ते गेले. आता महाराष्ट्रात ५ लाख कोटींची गुंतवणूक झालीय, एफडीएमध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे. आम्ही उद्योग राज्यात येण्यासाठी सुलभ प्रक्रिया सुरू केलीय. सिंगल विंडो सिस्टम, इन्फ्रास्ट्रक्चर, सोयीसुविधा देतोय असं सांगत शिंदेंनी आधीच्या सरकारवर भाष्य केले. 

राज ठाकरे-आनंद दिघेंचे संबंध चांगले, त्यामुळे....

राज ठाकरे काम करणारा माणूस, आनंद दिघे काम करणारा माणूस, दिघेसाहेब राज ठाकरेंच्या कामाचं कौतुक करायचे. कधी कधी त्यांची बाजू लावून धरायचे. त्यामुळे बऱ्याचदा मानसिक त्रास आनंद दिघेंना या लोकांनी दिला. नेतृत्वावर विश्वास नसेल तर अशाप्रकारे गोष्टी केल्या जातात. ठाणे जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात त्यांना पाठवण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं गुरू शिक्षाचे नाते होते. परंतु बाळासाहेबांच्या बाजूचे त्यांना आनंद दिघेंची लोकप्रियता खूपत होती असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shiv Senaशिवसेना