शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 13:09 IST

Loksabha Election - काही मूठभर लोक मोदी गेले पाहिजेत अशी विधाने करतात, २०१४, २०१९ लाही त्यांनी अशीच टीका केली होती. मात्र जनता मोदींसोबत आहे असं विधान एकनाथ शिंदेंनी केले आहे. 

मुंबई - Eknath Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) उद्धव ठाकरे कोत्या मनोवृत्तीचे, उबाठानं काँग्रेससोबत लोटांगण घातलं. ते लीन झालेत आणि विलीनकरण बाकी आहे. झोपता उठता, शिव्याश्राप देणारे त्यांच्यासोबत जाणार ही चर्चा निरर्थक आहे असं सांगत एकनाथ शिंदेंनीउद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, भगवा झेंडा बाळासाहेबांना जीव की प्राण होता, आज त्याच भगव्याशी प्रतारणा उद्धव ठाकरे करतायेत. भगव्याची एलर्जी त्यांना दिसते, हिंदुत्व सोडले आहे. श्रीकांतवरील एवढ्या खालच्या पातळीवरील टीका ऐकून खंत वाटते. परंतु समोरून अपेक्षा काय करणार? जे बाळासाहेब ठाकरेंना विसरले. त्यांचे विचार सोडले. उद्धव ठाकरेंचे संतुलन बिघडले आहे. लोकांसोबत २ वेळा विश्वासघात केलाय. जनतेसोबत, युतीसोबत आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत विश्वासघात केलाय. फक्त खुर्चीसाठी महाबेईमानी त्यांनी केली असा आरोप त्यांनी केला. झी २४ तासच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच मी संपूर्ण राज्यात फिरलो, काही मूठभर लोकांना मोदींबाबत एलर्जी आणि द्वेष आहेत. मोदी गेलेच पाहिजे असं त्यांचे म्हणणं आहे. परंतु मूठभर लोकांनी म्हणून काय होते, जनता मोदींसोबत आहेत. मौत का सौदागर, चौकीदार चोर है असे विविध आरोप विरोधकांनी याआधीही केले. आता तडीपार करणार, गाडून टाकणार अशी भाषा वापरली जाते. लाखो जनता आज मोदींसोबत आहेत. जेवढे विरोध करतात तेवढे लोक मोदींना मत करण्यासाठी पुढे येतात असा टोलाही एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला. 

दरम्यान, मराठीचा सन्मान राखलाच पाहिजे, त्यासाठी तडजोड होणार नाही. सरकार म्हणून काम करताना या राज्यातील प्रत्येकाला हे सरकार माझे आहे, त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे. उद्योजक असो वा शेतकरी, कामगार. मागील काळात उद्योजकांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवायला लागले ते कसे सुरक्षित राहणार? मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करायच्या असतील तर उद्योग धंदे आले पाहिजेत. त्यासाठी हे सरकार काम करतंय. वेदांता गेला, तेव्हा आमच्या सरकारला २ महिनेच झाले होते. २ महिन्यात उद्योग जात नाही. आधीच्या सरकारने स्वार्थासाठी अनेक गोष्टीची मागणी केली त्यामुळे ते गेले. आता महाराष्ट्रात ५ लाख कोटींची गुंतवणूक झालीय, एफडीएमध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे. आम्ही उद्योग राज्यात येण्यासाठी सुलभ प्रक्रिया सुरू केलीय. सिंगल विंडो सिस्टम, इन्फ्रास्ट्रक्चर, सोयीसुविधा देतोय असं सांगत शिंदेंनी आधीच्या सरकारवर भाष्य केले. 

राज ठाकरे-आनंद दिघेंचे संबंध चांगले, त्यामुळे....

राज ठाकरे काम करणारा माणूस, आनंद दिघे काम करणारा माणूस, दिघेसाहेब राज ठाकरेंच्या कामाचं कौतुक करायचे. कधी कधी त्यांची बाजू लावून धरायचे. त्यामुळे बऱ्याचदा मानसिक त्रास आनंद दिघेंना या लोकांनी दिला. नेतृत्वावर विश्वास नसेल तर अशाप्रकारे गोष्टी केल्या जातात. ठाणे जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात त्यांना पाठवण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं गुरू शिक्षाचे नाते होते. परंतु बाळासाहेबांच्या बाजूचे त्यांना आनंद दिघेंची लोकप्रियता खूपत होती असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shiv Senaशिवसेना