शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला...; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 13:42 IST

Mahavikas Aghadi Sabha for Supriya Sule इंदापूर येथे सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात संजय राऊतांनी अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. 

इंदापूर - Sanjay Raut on BJP, Ajit Pawar ( Marathi News ) पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. पराभवाची भीती वाटायला लागली, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत याचे भय वाटायला लागले तर तो मोदींचा मार्ग स्वीकारतो. धमक्या द्यायचा, पोलिसांचा वापर करायचा. आम्हाला धमक्या देतो आणि घेतोही. धमक्याचा प्रकार बारामतीत सुरू आहे हा डरपोकपणा आहे. धमक्या फोनवर दिल्या जातात, समोरून दिल्या जात नाही. तुमचं अस्तित्व फार थोडं आहे. तुम्ही बारामतीत धमक्या द्याल पण तुम्हाला मुंबईत यायचंय हे लक्षात ठेवा असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर केला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबई, ठाण्याला यायचंय, रस्ता आमचाच आहे. तुम्ही पवारांना धमक्या देताय की शिवसैनिकांना धमक्या देताय, कुणाला धमक्या देताय? धमक्या देऊ नका. आम्ही घाबरणारे लोक नाही. ही मर्दांची सभा आहे. जे नामर्द, डरपोक होते ते पळून गेले. तुमच्यात हिंमत असेल तर प्रचार करून निवडून येऊन दाखवा. ही लढाई बारामतीची नसून महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेची, स्वाभिमानाची लढाई आहे. तुमची दादागिरी, दहशतवाद आणि धमक्या, बारामतीचं कुणी गुजरात करू पाहत असेल तर इथं शिवसेनेचा भगवा ठामपणे उभा राहील असं त्यांनी सांगितले. 

भाजपा पक्ष शिल्लक राहतो का ते पाहाच

तसेच राजकारणातला माणूस विकासावर बोलतो, कामावर मत मागतो. धमक्या देऊन मते मागतात याचा अर्थ त्यांनी विकास केला नाही असा सरळ अर्थ आहे. तुम्हाला धमक्या द्यायची वेळ का येते, कारण लोक तुमच्यासोबत नाहीत. देवेंद्र फडणवीस म्हणतात, मी २ पक्ष फोडून आलो, पण ४ महिन्यांनी देशातलं सरकार बदलणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल, सत्ता आमच्याकडे असेल. तुम्ही ईडी, सीबीआयच्या दहशतीवर पक्ष फोडले. उद्या ही यंत्रणा आमच्या हातात येणार आहे त्यामुळे तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पाहा असा इशाराही राऊतांनी फडणवीसांना दिला. 

हर्षवर्धन पाटलांनी सोबत यावं 

दरम्यान, हर्षवर्धन पाटील हे आमचे मित्र आहेत. त्यांना गेल्या काही दिवसांपासून शांत झोप लागत नसेल. पण त्यांना स्वाभिमान असेल, मराठी म्हणून अस्मिता असेल. जर महाराष्ट्रावर प्रेम असेल तर या महाराष्ट्राच्या अस्मितेला आग लावण्याचा प्रयत्न सुरु असताना कुठल्याही मराठी नेत्याने आणि माणसाने शांत झोपू नये. जो आज शांतपणे झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे. तु्म्ही या मातीतले मराठी म्हणून म्हणवण्यास लायक नाही. त्यामुळे मैदानात उतरा, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी. त्यांच्या मनातील अस्वस्थता जाणवते असं सांगत संजय राऊतांनी हर्षवर्धन पाटलांना सोबत येण्याचं आवाहन केले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेbaramati-pcबारामतीSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४