शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नानाभौंची परीक्षा! आदल्या दिवशीचा निकाल दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वाढदिवसाचा मूड ठरवेल

By यदू जोशी | Updated: March 29, 2024 06:41 IST

Lok Sabha Election 2024 : ४ जूनला लोकसभेचे निकाल लागतील. ५ जूनला नानाभाऊंचा वाढदिवस. आदल्या दिवशीचा निकाल दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वाढदिवसाचा मूड ठरवेल.

काँग्रेस-भाजप-काँग्रेस असा प्रवास केलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बेधडक नेतृत्व आहे. स्वभावाने बंडखोर; वृत्ती लढाऊ, काँग्रेसमध्ये होते मग भाजपमध्ये गेले, पण तिथे रमले नाहीत, खासदार झाले, पण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशीच भिडले. खासदारकी सोडली; काँग्रेसमध्ये गेले. नागपुरात दिग्गज नितीन गडकरीविरुद्ध लढण्यास बडे बडे काँग्रेस नेते मागेपुढे पाहत असताना भंडारा-गोंदियाचे आपले क्षेत्र सोडून नानाभाऊ दंड थोपटून उभे राहिले. हरले पण आधीच्या निवडणुकीतील गडकरींचे मताधिक्य त्यांनी कमी केले. नानाभाऊ २०१९च्या विधानसभा निवडणुकीत जिंकले आणि विधानसभेचे अध्यक्ष झाले. मध्येच विधानसभा अध्यक्षपद सोडले. त्यांनी हे पद सोडले नसते तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले नसते, असेही म्हटले गेले.

लगेच नानाभाऊ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. एकमेकांना फटाके लावणे हा काँग्रेसमधील जुना रोग आहे आणि त्यावर अजूनही जालीम औषध सापडलेले नाही. नानाभाऊंनाही त्याचा त्रास झाला अन् होतोदेखील पण दिल्लीश्वरांच्या आणि विशेषतः राहुल गांधी यांच्या पाठबळामुळे त्यांचे कोणी काही वाकडे करू शकलेले नाही. त्यांना हटविण्याच्या हालचाली अनेकदा झाल्या, पण फायदा झाला नाही. काँग्रेसमध्ये त्यांच्या कार्यशैलीचे चाहते आणि या कार्यशैलीवर नाराज असलेले असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. एक नक्की की नानाभाऊ भाजप, मोदी-शाह, फडणवीसांना थेट भिडतात. टीका करायला मागेपुढे पाहत नाहीत. एखाद्या गोष्टीचा अभ्यास नसेल, मागचे-पुढचे संदर्भ माहिती नसतील तरी ती उणीव ते आक्रमक बॅटिंग करून भरून काढतात. मोदी-शाह-फडणवीसांना हेडऑन घेणारा नेता अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली, ती दिल्लीश्वरांपर्यंत व्यवस्थित पोहोचवली देखील.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे कान मोठे असावे लागतात. ते नानाभाऊंचे नाहीत; आजूबाजूची माणसे त्यांच्या कानात सांगतात आणि काड्या करतात, असा आक्षेप आहे. प्रदेश काँग्रेसच्या कारभारात दिल्लीश्वरांनी त्यांना खुली छूट दिली आहे. स्वपक्षाच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांशी नानाभाऊंचे फार चांगले ट्युनिंग नाही; पण काँग्रेसमध्ये हे आजचे नाही. पायओढेपणा हा या पक्षाला नेहमीच मारक राहिला आहे. काँग्रेसइतके अंतर्गत स्वातंत्र्य असलेला दूसरा पक्ष नाही. खरेतर अतिलोकशाहीने काँग्रेसचे मोठे नुकसान आज काँग्रेस एका निर्णायक झाले. वळणावर येऊन उभी आहे. 

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अवास्तव अधिक जागा दिल्या गेल्या असे म्हटले जाते, पण मित्रपक्षांना सांभाळून घ्या, असा दिल्लीचा निरोप असल्याने त्या लाइनवर पटोले चालले. शिवाय ते पूर्वीसारखे हट्टी, दुराग्रही राहिलेले नाहीत. रोज सकाळी एक संयमाची गोळी खातात. काँग्रेसला यावेळी चांगली संधी असल्याने त्यांनी स्वत:कडे अधिक जागा घ्यायला हव्या होत्या, अशी एक भावना असली तरी इतर दोन्ही मित्रांना काँग्रेसने सन्मानजनक जागा देताना खळखळ केली नाही. है औदार्य फायद्याचे ठरते की तोट्याचे, हे निकालावरून दिसेलच, आक्रमक नाना पटोले यांच्या नेतृत्वाची ही निवडणूक म्हणजे मोठी परीक्षा असेल. ४ जूनला लोकसभेचे निकाल लागतील. ५ जूनला नानाभाऊंचा वाढदिवस. आदल्या दिवशीचा निकाल दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वाढदिवसाचा मूड ठरवेल.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४