शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

वंचितकडून १२ जागांची मागणी, संजय राऊतांनी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 11:40 IST

Sanjay Raut : गेल्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मतं मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी १२ जागांची मागणी करण्यात आली आहे.

अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून जागावाटपाबाबत काथ्याकूट सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससह ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हे प्रमुख पक्ष आहेत. तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून १२ जागांची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान करताना महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करून सांगितला आहे. तसेच नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना महत्त्वाचं आवाहनही केलं आहे. 

आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी वंचितकडून करण्यात आलेल्या १२ जागांच्या मागणीबाबत प्रश्न विचारला असता. संजय राऊत यांनी मविआतील जागावाटपाबाबतच्या फॉर्म्युल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, या चर्चा आम्ही वृत्तपत्रांमधून पाहतोय. जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होते. तेव्हा आम्ही त्यांनाही हे सांगितलं आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून कुठलीही ओढाताण नाही. तसेच पुढेही ती होणार नाही. जागांचं वाटप हे निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार यावरूनच होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात या भूमिकेबाबत एकमत आहे. तसेच याबाबत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांचं एकमत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचीही त्याला मान्यता आहे, या सूत्रानुसारच आम्ही पुढे जात आहोत, असे संजय राऊत म्हणाले. 

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, वंचित बहुजन आघाडीला नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीविरोधात लढायचं आहे. नरेंद्र मोदी जर पुन्हा सत्तेत आले, तर हा देश हुकूमशाहीच्या खाईत ढकलला जाईल आणि विरोधी पक्षाला तिहारमध्ये बसावं लागेल, ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका हा देशासाठी फार मोठा मंत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, या संविधानाचं महत्त्व त्यांना सर्वाधिक माहिती आहे.यावेळी स्वातंत्र्यलढ्यातील भाजपाच्या सहभागावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली. ते म्हणाले, देशाने स्वातंत्र्यालाठी दिडशे वर्षे संघर्ष केला. या दिडशे वर्षांच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये हे लोक कुठेच नव्हते. मला आता कुणाची नावं घ्यायची नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर