शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

वंचितकडून १२ जागांची मागणी, संजय राऊतांनी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 11:40 IST

Sanjay Raut : गेल्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मतं मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी १२ जागांची मागणी करण्यात आली आहे.

अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून जागावाटपाबाबत काथ्याकूट सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससह ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हे प्रमुख पक्ष आहेत. तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून १२ जागांची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान करताना महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करून सांगितला आहे. तसेच नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना महत्त्वाचं आवाहनही केलं आहे. 

आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी वंचितकडून करण्यात आलेल्या १२ जागांच्या मागणीबाबत प्रश्न विचारला असता. संजय राऊत यांनी मविआतील जागावाटपाबाबतच्या फॉर्म्युल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, या चर्चा आम्ही वृत्तपत्रांमधून पाहतोय. जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होते. तेव्हा आम्ही त्यांनाही हे सांगितलं आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून कुठलीही ओढाताण नाही. तसेच पुढेही ती होणार नाही. जागांचं वाटप हे निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार यावरूनच होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात या भूमिकेबाबत एकमत आहे. तसेच याबाबत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांचं एकमत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचीही त्याला मान्यता आहे, या सूत्रानुसारच आम्ही पुढे जात आहोत, असे संजय राऊत म्हणाले. 

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, वंचित बहुजन आघाडीला नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीविरोधात लढायचं आहे. नरेंद्र मोदी जर पुन्हा सत्तेत आले, तर हा देश हुकूमशाहीच्या खाईत ढकलला जाईल आणि विरोधी पक्षाला तिहारमध्ये बसावं लागेल, ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका हा देशासाठी फार मोठा मंत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, या संविधानाचं महत्त्व त्यांना सर्वाधिक माहिती आहे.यावेळी स्वातंत्र्यलढ्यातील भाजपाच्या सहभागावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली. ते म्हणाले, देशाने स्वातंत्र्यालाठी दिडशे वर्षे संघर्ष केला. या दिडशे वर्षांच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये हे लोक कुठेच नव्हते. मला आता कुणाची नावं घ्यायची नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर