शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

वंचितकडून १२ जागांची मागणी, संजय राऊतांनी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 11:40 IST

Sanjay Raut : गेल्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मतं मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी १२ जागांची मागणी करण्यात आली आहे.

अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून जागावाटपाबाबत काथ्याकूट सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससह ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हे प्रमुख पक्ष आहेत. तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून १२ जागांची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान करताना महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करून सांगितला आहे. तसेच नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना महत्त्वाचं आवाहनही केलं आहे. 

आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी वंचितकडून करण्यात आलेल्या १२ जागांच्या मागणीबाबत प्रश्न विचारला असता. संजय राऊत यांनी मविआतील जागावाटपाबाबतच्या फॉर्म्युल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, या चर्चा आम्ही वृत्तपत्रांमधून पाहतोय. जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होते. तेव्हा आम्ही त्यांनाही हे सांगितलं आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून कुठलीही ओढाताण नाही. तसेच पुढेही ती होणार नाही. जागांचं वाटप हे निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार यावरूनच होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात या भूमिकेबाबत एकमत आहे. तसेच याबाबत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांचं एकमत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचीही त्याला मान्यता आहे, या सूत्रानुसारच आम्ही पुढे जात आहोत, असे संजय राऊत म्हणाले. 

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, वंचित बहुजन आघाडीला नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीविरोधात लढायचं आहे. नरेंद्र मोदी जर पुन्हा सत्तेत आले, तर हा देश हुकूमशाहीच्या खाईत ढकलला जाईल आणि विरोधी पक्षाला तिहारमध्ये बसावं लागेल, ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका हा देशासाठी फार मोठा मंत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, या संविधानाचं महत्त्व त्यांना सर्वाधिक माहिती आहे.यावेळी स्वातंत्र्यलढ्यातील भाजपाच्या सहभागावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली. ते म्हणाले, देशाने स्वातंत्र्यालाठी दिडशे वर्षे संघर्ष केला. या दिडशे वर्षांच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये हे लोक कुठेच नव्हते. मला आता कुणाची नावं घ्यायची नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर