शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 15:38 IST

Nagpur Loksabha Election 2024 - नागपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी हे सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत. यात गडकरींनी सध्या राजकीय घडामोडी आणि विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. 

नागपूर -  Nitin Gadkari on Congress ( Marathi News ) भाजपा सरकार येताच देशातील संविधान बदलणार अशाप्रकारे अपप्रचार करण्याचं काम विरोधक करतायेत. काँग्रेस यातून लोकांची दिशाभूल करतंय असं सांगत नागपूरचेभाजपा उमेदवार नितीन गडकरी यांनी संविधान बदलाच्या टीकेवरून स्पष्टच उत्तर दिले. 

लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले की, भारताचं संविधान बदलणार असा सध्या अपप्रचार केला जात आहे. मुळात सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठाने घटनेचा मूळ गाभा कधीच बदलता येत नाही असं सांगितले आहे. काँग्रेसनं आजपर्यंत ८० वेळा घटनेत दुरुस्ती केली आहे. मात्र भाजपा सरकार आल्यास संविधानात बदल होईल असं सांगून काँग्रेस दलित समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायेत. मुस्लीमांच्या मनात भीती निर्माण करतायेत. कुठलाही जातधर्म न बाळगता आम्ही काम करतोय. आज नागपूरकरांच्या प्रेमाचं ऋण कसं उतरवायचं हा प्रश्न माझ्या मनात आहे. इतकं प्रेम मला लोकांकडून मिळत आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच जात, पंथ भाषा यापलीकडे मी काम करतो. जातीपलीकडे जाऊन मी काम करतोय. माणूस जातीने नव्हे तर कर्तृत्वानं मोठा असतो. ज्यांनी मला मते दिली त्यांचीही आणि ज्यांनी मते दिली नाहीत त्यांचीही कामे करेन असं मी नेहमी बोलतो. जे लोक आपल्या कामाने निवडून येत नाहीत ते जाती आणि धर्माचा आधार घेतात. मी महाराष्ट्राचा दिल्लीत प्रतिनिधी आहे. ५ लाख कोटी मी माझ्या विभागातून महाराष्ट्राला दिलेत. नागपूरच्या जनतेचा खासदार असल्याने त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे माझी जबाबदारी आहे असंही नितीन गडकरींनी सांगितलं. 

दरम्यान, गेल्या १० वर्षात १ लाख कोटींची कामे नागपूरात झाली. प्रदुषणमुक्त, स्वच्छ सुंदर शहर करण्याचं स्वप्न आहे. नागपूरात २५० गार्डन, ३५० खेळाची मैदाने आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २ स्विमिंग टँक, ऑडिटोरिएम यातून नागपूरचा सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्रात विकास झाला पाहिजे. नागपूर आता शैक्षणिक हब होतंय. सिम्बॉसिस, ४९ इंजिनिअर कॉलेज, IIT, एम्ससारखे प्रकल्प आलेत. संपूर्ण विदर्भाला शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून मुक्त करायचं, अॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून सिंचन, नैसर्गिक शेती यासारखे अनेक कामे सुरू आहेत. मोदींच्या नेतृत्वात १० वर्षाच्या कामगिरीचा चांगला परिणाम देशात दिसेल. भाजपा ३७० आणि एनडीए ४०० जागांच्या पार नक्की जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत. मोदींच्या नेतृत्वात आमचं सरकार येईल असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला.

राजकारणापेक्षा समाजकारण करतो

योग्य काम झालं पाहिजे, प्रत्येकाचं काम करतो, त्यात राजकारण नाही. लोकशाहीतील प्रगल्भ भावना त्यामागे आहे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. राजकारणापेक्षा समाजकारण, विकासकारण करतो, ४५ हजारापेक्षा जास्त हृदयविकाराच्या रुग्णांना मदत केलीय. कोविड काळात १०० कोटींचे साहित्य आणले, विमानातून ऑक्सिजन ट्रक आणलेत. समाजसेवा यालाच मी राजकारण म्हणतो. सिकलसेल ॲनिमिया आणि थॅलेसेमिया हा इथला फार मोठा रोग आहे. अवयव प्रत्यारोपणाची व्यवस्था आम्ही इथं आणतोय.  एम्समुळे इथल्या गरीब लोकांना कुठेही जाण्याची गरज भासणार नाही असं गडकरींनी सांगितलं. 

मतभिन्नता असावी, मनभेद नको

लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधक दोघांचीही भूमिका महत्त्वाची आहे. आपली लोकशाही जगातील सर्वात मोठी आहे. मतभिन्नता असली पाहिजे मनभेद नाहीत. राजकारणात गुणात्मक बदल व्हावेत. यासाठी लोकशाहीच्या ४ घटकांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. विचार, सिद्धांताच्या आधारावर, मतदारसंघातील कामगिरीच्या आधारे विचार करायला हवा असं नितीन गडकरींनी राजकीय नेत्यांना सल्ला दिला. 

त्याचसोबत राजकारण आणि व्यक्तिगत संबंध वेगळे आहेत. मी ज्याचा मैत्रीचा हात पकडला तो कायम ठेवला आहे. सरकार बदलत राहतील, आघाड्या बदलत राहतील. व्यक्तिगत संबंध तसेच कायम राहतील यावर माझा विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान माझ्या हृदयात आहे. आजही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसोबत माझे कौटुंबिक संबंध आहेत. राजकारणातले मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येण्याबाबत ही लोकशाहीतील प्रगल्भता देशात  महाराष्ट्र प्रस्थापित करू शकतो. कारण तेवढी सुदृढ परंपरा महाराष्ट्रात आहे. राजकारणात निवडणूक लढवाव्यात, टीका टिप्पणी करावी. आपण एकमेकांचे शत्रू नाही. वैचारिक मतभिन्नता आहे असं समजून काम करायला हवे असं भाष्यही गडकरींनी केले.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाcongressकाँग्रेसnagpur-pcनागपूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४