शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

'सो कॉल्ड' मोदीलाट मला माहित नाही : उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 15:50 IST

भाजपने मागील चार वर्षात ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळे जनता भाजपला चांगल्या पद्धतीने पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटले आहे.

सातारा - बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. माढामधील लोकांना साताऱ्याचे खासदार कोण, माहित नाही, या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या वक्तव्याचा उदयनराजे यांनी आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.

मला फक्त समुद्राची लाट माहित आहे. जर साताराच्या जनतेला मी कोण आहे माहित नसतं, तर मोदींची जी काय 'सो कॉल्ड' लाट असताना मी निवडून आलो नसतो, असं उदयनराजे यांनी म्हटले. तसेच भाजपने मागील चार वर्षात ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळे जनता भाजपला चांगल्या पद्धतीने पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असंही यावेळी उदयनराजे यांनी म्हटले आहे.

तुम्ही सध्या शांत वाटत आहात, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले की, एखाद्यावर अन्याय होत असेल तर निवडणुका असो वा नसो, सत्ता असो नसो निश्चितच मी आक्रमक राहणार आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करणार, परंतु आज आक्रमक होण्याची गरज नाही. तसेच मी कधीच चुकत नाही, पण तुम्ही चुका शोधू नका, अशी कोपरखळी देखील यावेळी उदयनराजे यांनी लगावली.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील सुभाष देशमुख यांच्यावर टीका केली. देशमुखांनी माढामधून लोकसभा निवडणूक लढवावी, त्यानंतरच त्यांना साताऱ्याची लाट काय असते हे उदयनराजे दाखवून देतील, असं शिंदे यांनी म्हटले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस