शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

रणसंग्राम २०१९ : लक्ष्यस्थानी होतं भाजप अन् 'टार्गेट' झाली शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 16:10 IST

भय पक्षांतील वाद विकोपाला गेल्यानंतर देखील युती झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर अनेकांच्या मते अंतर्गत सर्व्हेमुळेच युती निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. चर्चा काहीही असली तरी भाजप आणि शिवसेना एकोप्याने लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले.

मुंबई - महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान झाले असून २९ एप्रिल रोजी राज्यातील मतदानाचा अखेरचा टप्पा समाप्त होणार आहे. मतदान झालेल्या ३१ जागांचे रिपोर्ट येण्यास सुरुवात झाली असून ही लोकसभा निवडणूक शिवसेनेला २०१४ च्या तुलनेत खडतर ठरणार असल्याचे समजते.

काही महिन्यांपूर्वी भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत युती नाहीच, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. अनेकदा सत्तेला लाथ मारण्याची भाषाही केली होती. परंतु, केंद्रीय नेतृत्वासोबतच्या बैठकीनंतर शिवसेना-भाजपचा मिलाप झाला. उभय पक्षांतील वाद विकोपाला गेल्यानंतर देखील युती झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर अनेकांच्या मते अंतर्गत सर्व्हेमुळेच युती निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. चर्चा काहीही असली तरी भाजप आणि शिवसेना एकोप्याने लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले.

लोकसभा प्रचारात देखील आघाडी आणि भाजप यांच्यातच खरी लढत पाहायला मिळाली. यामध्ये शिवसेना फारशी रणांगणावर दिसून आली नाही. आघाडीकडून सर्वाधिक लक्ष्य भाजपला करण्यात आले. तर आघाडीच्या नेत्यांकडून सर्वाधिक टीका भाजपवर करण्यात आली. भाजपने या निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा चांगलाच रेटला. मात्र शिवसेनेचे प्रचारातील मुद्दे अखेरपर्यंत समोर आलेच नाही. अखेरच्या टप्प्यात शिवसेनेकडून वि.दा. सावरकर यांच्याविषयी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. हा मुद्दा वगळल्यास लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा स्टॅन्ड फारसा लक्षवेधी ठरला नाही, हे वास्तव आहे.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना युती फिसकटली होती. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्याकडून एकमेकांवर झालेली टीका संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली होती. तर प्रमुख विरोधक असलेली आघाडी कुठेही दिसत नव्हती. सगळीकडे शिवसेना आणि भाजपचीच चर्चा होती. शिवसेना आणि भाजपला याची मदतच झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या लक्ष्यस्थानी जरी भाजप असले तरी टार्गेट शिवसेनाच झाल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांनी देखील शिवसेनेवरील टीका टाळली असून लोकसभा निवडणुकीत उल्लेख न झाल्याने शिवसेनेच्या समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाShiv Pratap Shuklaशिव प्रताप शूक्ला