शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

रणसंग्राम २०१९ : लक्ष्यस्थानी होतं भाजप अन् 'टार्गेट' झाली शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 16:10 IST

भय पक्षांतील वाद विकोपाला गेल्यानंतर देखील युती झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर अनेकांच्या मते अंतर्गत सर्व्हेमुळेच युती निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. चर्चा काहीही असली तरी भाजप आणि शिवसेना एकोप्याने लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले.

मुंबई - महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान झाले असून २९ एप्रिल रोजी राज्यातील मतदानाचा अखेरचा टप्पा समाप्त होणार आहे. मतदान झालेल्या ३१ जागांचे रिपोर्ट येण्यास सुरुवात झाली असून ही लोकसभा निवडणूक शिवसेनेला २०१४ च्या तुलनेत खडतर ठरणार असल्याचे समजते.

काही महिन्यांपूर्वी भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत युती नाहीच, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. अनेकदा सत्तेला लाथ मारण्याची भाषाही केली होती. परंतु, केंद्रीय नेतृत्वासोबतच्या बैठकीनंतर शिवसेना-भाजपचा मिलाप झाला. उभय पक्षांतील वाद विकोपाला गेल्यानंतर देखील युती झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर अनेकांच्या मते अंतर्गत सर्व्हेमुळेच युती निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. चर्चा काहीही असली तरी भाजप आणि शिवसेना एकोप्याने लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले.

लोकसभा प्रचारात देखील आघाडी आणि भाजप यांच्यातच खरी लढत पाहायला मिळाली. यामध्ये शिवसेना फारशी रणांगणावर दिसून आली नाही. आघाडीकडून सर्वाधिक लक्ष्य भाजपला करण्यात आले. तर आघाडीच्या नेत्यांकडून सर्वाधिक टीका भाजपवर करण्यात आली. भाजपने या निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा चांगलाच रेटला. मात्र शिवसेनेचे प्रचारातील मुद्दे अखेरपर्यंत समोर आलेच नाही. अखेरच्या टप्प्यात शिवसेनेकडून वि.दा. सावरकर यांच्याविषयी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. हा मुद्दा वगळल्यास लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा स्टॅन्ड फारसा लक्षवेधी ठरला नाही, हे वास्तव आहे.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना युती फिसकटली होती. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्याकडून एकमेकांवर झालेली टीका संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली होती. तर प्रमुख विरोधक असलेली आघाडी कुठेही दिसत नव्हती. सगळीकडे शिवसेना आणि भाजपचीच चर्चा होती. शिवसेना आणि भाजपला याची मदतच झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या लक्ष्यस्थानी जरी भाजप असले तरी टार्गेट शिवसेनाच झाल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांनी देखील शिवसेनेवरील टीका टाळली असून लोकसभा निवडणुकीत उल्लेख न झाल्याने शिवसेनेच्या समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाShiv Pratap Shuklaशिव प्रताप शूक्ला