शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

सर्वांनी एकत्र येऊन सरकारला जाग आणू : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 17:31 IST

शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं सरकारपर्यंत पोहचवण्याच काम करू, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेईन.

मुंबई - महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका संपल्या आणि नेतेमंडळी रिलॅक्स मोडमध्ये आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला दुष्काळी दौरा सुरु केला आहे. सरकारने दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केले तर, सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा शरद पवार यांनी दिला. रविवारी ते सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधला.

महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या सर्वसामान्य नागरिकांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गत वर्षी पाऊस कमी पडला त्यामुळे या वर्षी दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. असे शरद पवार म्हणाले,

आमच्या काळात दुष्काळग्रस्त दौऱ्याच्या वेळी आम्ही गोळी पेंड चारा छावण्यांमध्ये पुरवली जात होती. चारा छावण्यांमधील जनावरांच्या दुधामध्ये चांगली वाढ झाली होती. मात्र, आताच सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देताना कुठेही दिसून येत नसल्याचा आरोप पवार यांनी केला.

शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं सरकारपर्यंत पोहचवण्याच काम करू, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेईन. शेतकऱ्यांचं दुःख सरकार समोर मांडेन त्यानंतरही सरकारला जर जाग आली नाही तर सर्वांनी एकत्र येऊन सरकारला जाग आणू, असा इशाराही पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारdroughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस