शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

राज तुम्ही करू नका जास्त नखरे, बाळसाहेबांचे खरे वारस उद्धव ठाकरे : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 13:21 IST

रामदास आठवले पुढे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, आठ दिवस राज ठाकरे गुजरात मध्ये राहून आले. गुजरात मधील विकास कामांची स्तुती केली. महाराष्ट्र सरकारने गुजरातिची भूमिका स्वीकारावी असे राज म्हणाले होते. मात्र तेच राज ठाकरे आता पंतप्रधान मोदींवर आज टीका करत आहे.

मुंबई – केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपल्या कवितेतून राज यांच्यावर निशाणा साधला. राज तुम्ही करू नका जास्त नखरे कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे, अशी कविता करत आठवलेंनी आपल्या भाषणातून राज यांच्यावर टीका केली. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आधीच ५६ विरोधक एकत्र आले आहेत. त्यात आता ५७ नंबरला राज ठाकरे आले तरीही काही फरक पडणार नाही अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली. सभेला गर्दी करण्याच्या नियोजन राज ठाकरेंकडे आहे पण उमेदवार कसे निवडून आणायचे हे नियोजन आमच्याकडे आहे असा टोला आठवलेंनी लागवला.

रामदास आठवले पुढे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, आठ दिवस राज ठाकरे गुजरात मध्ये राहून आले. गुजरात मधील विकास कामांची स्तुती केली. महाराष्ट्र सरकारने गुजरातिची भूमिका स्वीकारावी असे राज म्हणाले होते. मात्र तेच राज ठाकरे आता पंतप्रधान मोदींवर आज टीका करत आहे. बाळासाहेब ठाकरे सुद्धा टीका करायचे पण अशा टीका त्यांनी कधी केली नाही अशी आठवण आठवलेंनी करून दिली.

राष्ट्रवादी - काँग्रेस सोबत गेले आहेत राज                                                                                                                                                       

 म्हणुनच इथे आलो आहे मी आज                                                                                                                                                                           

कारण मला जिरवायचा आहे महाआघाडीचा माज...

नेहमी वेगळ्या पद्धतीने कविता करत भाषण देण्यात पटाईत असलेले आठवलेंनी यावेळीही कविता करत राज आणि आघाडीवर अश्याप्रकारे टीका केली. आपल्या भाषणात आठवलेंनी नेहमीप्रमाणे पंतप्रधान यांची स्तुती सुद्धा केली. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRamdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी