शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

राज ठाकरेंनी शिवसेनेला अनुल्लेखाने मारले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 15:20 IST

राज ठाकरे यांनी ६० पेक्षा अधिक आमदार आणि १० हून अधिक खासदार असलेल्या शिवसेनेला गृहितही धरले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई - शिवसेनेशी झालेल्या मतभेदानंतर आपला सवता सुबा निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमधून सर्वाधिक प्रमाणात शिवसेना आणि शिवसेनेच्या नेतृत्वावर टीका केली, अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. हे रोखण्यासाठी आणि राज-उद्धव समेट घडविण्यासाठी अनेक प्रयत्नही झाले. परंतु, त्याचा काहीही फायदा झाला नाही. याउलट शिवसेना-मनसे यांच्यात शाब्दिक चकमक सुरूच असते. परंतु, शनिवारी झालेल्या गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी ६० पेक्षा अधिक आमदार आणि १० हून अधिक खासदार असलेल्या शिवसेनेला गृहितही धरले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

२०१४ ते २०१८ या कालावधीत भाजप-शिवसेना यांची युती झाली. त्यानंतर वाद झाले, वाद एवढे विकोपाला गेले की, शिवसेना नेत्यांनी राजीनामा खिशात ठेवण्यास सुरुवात केली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी अफजल खान म्हणून संबोधले होते. अलिकडच्या काळात तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती नाहीच, अशी भूमिका जाहीर केली. मात्र भाजप नेतृत्वाने फिरवलेली जादुची कांडी अशी चालली की, शिवसेना-भाजप सख्ख्या भावाप्रमाणे वागू लागले. उद्धव ठाकरे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मोदींना विष्णूचा अवतार म्हणून संबोधले.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी गुडीपाडवा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. मोदी, शाह या जोडगोळीला हद्दपार करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. परंतु, यावेळी राज यांनी शिवसेनेचा उल्लेख देखील केला नाही. भाजपसोबत गेलेल्या शिवसेनेवर राज ठाकरे जोरदार टीका करणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, राज यांनी शिवसेनेचा साधा उल्लेखही न करणे हीच मोठी टीका असल्याचे अनेकांचे मत आहे. अर्थात राज यांनी शिवसेनेला अनुल्लेखानेच मारले, अशी मनसे सैनिकांची भावना आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे