शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

Lok Sabha Election 2019 : राहुल गांधी साधणार पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 10:27 IST

वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल नागपुरात सभा घेणार आहे. त्यानंतर ते पुण्याला रवाना होतील. ५ एप्रिल रोजी राहुल पुण्यातील भारती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि वर्धा येथे दोन सभांना राहुल गांधी संबोधित करणार आहेत.

मुंबई - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. दक्षिण भारतातील वायनाड मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यानंतर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासाठी राहुल गुरुवारी प्रचारसभा घेणार आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यात राहुल गांधी तीन प्रचार सभा घेणार असून पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे.

वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल नागपुरात सभा घेणार आहे. त्यानंतर ते पुण्याला रवाना होतील. ५ एप्रिल रोजी राहुल पुण्यातील भारती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे अराजकीय असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि वर्धा येथे दोन सभांना राहुल गांधी संबोधित करणार आहेत.

नागपूरमधून काँग्रेसनेचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारासाठी राहुल यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि वर्ध्यातील सभेचे नियोजन आहे. गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यात जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर आता राहुल खुद्द वर्ध्यात सभा घेणार आहेत. त्यामुळे वर्ध्यातील लढत चुरशीची मानली जात आहे.

राहुल गांधी यांच्या नागपुरातील सभेचे आयोजन ५ एप्रिल रोजी कऱण्यात आले होते. परंतु, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या सभेमुळे राहुल यांच्या सभेच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे.

दरम्यान दुसऱ्या टप्प्यात लातूरमधील औसा आणि औरंगाबाद येथे राहुल गांधी यांच्या सभेच्या आयोजनासाठी काँग्रेसच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस