शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Lok Sabha Election 2019: प्राप्तिकर विभागाची ४२ मतदारसंघांवर नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 7:04 AM

अर्ध्या तासात कारवाई; निवडणुकीतील काळ्या पैशांवर ठेवणार लक्ष

पुणे : लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या काळ्या पैशांच्या वापराला आळा बसावा यासाठी प्राप्तिकर विभागाने प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दलाची (क्विक रिस्पॉन्स टीम) स्थापना केली आहे. प्राप्तिकरच्या पुण्यातील कार्यालयातून मुंबई वगळता राज्यातील ४८ पैकी ४२ लोकसभा मतदारसंघावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाचे (तपास) महासंचालक दीपक कपूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.प्राप्तिकर विभागाचे (तपास) अतिरिक्त संचालक तथा तपास यंत्रणेचे राज्याचे समन्वयक अजय मोदी, अतिरिक्त संचालक रवी प्रकाश या वेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाचा वापर होऊ नये यासाठी प्राप्तिकर विभागाने सतर्क राहावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्राप्तिकर विभागाने तपास यंत्रणा आणि गुप्तचर विभागाला दक्षतेचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. सहायक आयुक्त अथवा उपायुक्तांच्या देखरेखीखाली पाच अधिकाऱ्यांचे पथक यात असेल. त्या माध्यमातून मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे अथवा मौल्यवान वस्तूंच्या वापरावर नजर ठेवली जाणार आहे.याबाबत माहिती देताना प्राप्तिकर विभागाचे (तपास) महासंचालक कपूर म्हणाले, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ वगळता उर्वरित राज्यातील ४२ मतदारसंघांमधील काळ्या पैशाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पुणे कार्यालयावर असेल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सोमवारी (दि. ११) नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. पाठोपाठ प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दल स्थापण्यात आले. राज्यातील ४२ मतदारसंघांचे नाशिक, नागपूर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर असे पाच विभाग करण्यात आले असून, त्याच्या नियंत्रणाची जबाबदारी अतिरिक्त संचालक आणि चार सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मतदाराला प्रभावित करण्यासाठी पैसे, सोने, चांदी अथवा मौल्यवान वस्तूंचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. निवडणूककाळात काळ्या पैशांचा वापर करताना आढळल्यास, नागरिकांनी प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी चोवीस तास निरीक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तक्रार करण्यासाठी अथवा माहिती देण्यासाठी १८००२३३०७०० अथवा १८००२३३०७०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय ७४९८९७७८९८ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अवघ्या अर्ध्या तासात कारवाई करण्यात येईल.काळा पैसा बाळगणाºयांना मिळणार ‘दंड’निवडणुकीदरम्यान काळा पैसा आढळणाºयांवर प्राप्तिकर विभागाकडून ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी कारवाई होईल. दंडासह ती रक्कम भरावी लागेल.अनेकदा नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून अशा रकमेचा निवडणुकीत वापर केला जातो. त्यामुळे रकमेचा स्रोत देखील तपासण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त पोलीसह संबंधितांवर वेगळी कारवाई करतील.निवडणुकात होणारा काळा पैशांचा वापर रोखण्याची जबाबदारी प्राप्तिकर विभागावर आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती प्राप्तिकर विभागाला टोल-फ्री क्रमांकाद्वारे कळवावी. याशिवाय बँक खात्यातून होणाºया उलाढालीवर देखील नजर ठेवण्यात येणार आहे. संबंधित बँकांनी संशयित व्यवहार, अचानक मोठ्या प्रमाणात झालेली पैशांची उलाढाल याची माहिती कळविल्यास, त्याचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.- दीपक कपूर, महासंचालक(तपास), प्राप्तिकर विभाग

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय