शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

…म्हणून हिंगोलीतून राजीव सातव फिरले माघारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 11:08 IST

विशेष म्हणजे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्याऐवजी वानखेडे उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची नववी यादी रविवारी प्रसिद्ध झाली. यामध्ये अनेक आश्चर्यकारक बदल करण्यात आले आहेत. हिंगोली मतदार संघातून पूर्वीचे शिवसेनेचे आणि आता भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले सुभाष वानखेडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्याऐवजी वानखेडे उमेदवारी देण्यात आली आहे.

सातव यांनी आपल्याकडे गुजरात लोकसभेची जबाबदारी सोपविल्यामुळे माघार घेतल्याचे म्हटले आहे. याआधी गुजरात विधानसभा निवडणुकीत सातव यांनी गुजरातमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांच्याकडे गुजरातची जबाबदारी सोपविली आहे. पक्ष नेतृत्वाने सांगितल्यामुळेच आपण गुजरातमध्ये काँग्रेस प्रभारी म्हणून काम करणार असल्याचे सातव म्हणाले. सातव यांनीच २०१४ मध्ये मोदी लाटेत शिवसेनेकडून लढत असलेल्या सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता.

सुभाष वानखेडे यांनी रविवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना हिंगोलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली. विद्यमान खासदार सातव यांच्याकडे गुजरातची जबाबदारी सोपविल्यामुळे हिंगोलीचा उमेदवार निवडण्याची जबाबदारी आपल्याकडे देण्यात आली होती. त्यानुसार सर्वांशी चर्चा करून वानखेडे यांची निवड केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

भाजप नेतृत्वाला हिंगोलीतून आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा गड असलेल्या गुजरातमध्ये सातव काँग्रेसला अधिकाअधिक जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच भाजप नेतृत्वाला अधिकाअधिक गुजरातमध्ये अडकवून ठेवण्यासाठी व्यूहरचना करण्यासाठी सातव यांची पक्षाला मदत होणार आहे. अमित शाह गांधीनगर येथून निवडणून लढविणार आहेत. त्यामुळे हिंगोलीतून एकप्रकारे भाजपला अप्रत्यक्ष आव्हान मिळणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण