शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

काँग्रेसकडून औरंगाबादेत झांबड, तर जालन्यातून औताडे यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 09:47 IST

गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या उमेदवारीवर चर्चा सुरू होत्या. तसेच शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नावाची देखील चर्चा होती. परंतु औरंगाबादमधून काँग्रेसकडून सुभाष झांबड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर हर्षवर्धन यांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने रात्री उशीरा ३५ उमेदवारांची यादी जाहीर कऱण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद, जालना आणि लातूर मतदार संघाचे उमेदवार काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या उमेदवारीवर चर्चा सुरू होत्या. तसेच शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नावाची देखील चर्चा होती. परंतु औरंगाबादमधून काँग्रेसकडून सुभाष झांबड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर हर्षवर्धन यांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना मतदार संघातील उमेदवारीचा तिढा अनेक दिवसांपासून निर्माण झाला होता. सुभाष झांबड हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे असून त्यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत लवकरच संपणार आहे. विलास औताडे हे २०१४ मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना आव्हान देणार आहे.

दुसरीकडे जालना जिल्ह्यातील अर्जुन खोतकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या शक्यतेमुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले होते. परंतु, खोतकर यांचे बंड शांत करण्यात शिवसेना आणि भाजपला यश आले. त्यानंतर खोतकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या आशा मावळल्या होत्या. अखेरीस काँग्रेसने शुक्रवारी उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये विलास औताडे यांना जालन्याची उमेदवारी दिली आहे. तर लातूरमधून मच्छींद्र कामत यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Subhash Zambadसुभाष झांबडcongressकाँग्रेस