शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भाजपने मला बारामतीत थांबूच दिले नाही; शरद पवारांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 17:02 IST

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर आपल्याला बारामतीत थांबूच दिले नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना धक्कादायक खुलासा केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर आपल्याला बारामतीत थांबूच दिले नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार सध्या हैदराबाद येथे चंद्राबाबू नायडू यांच्यासोबतच्या बैठकीत उपस्थित आहेत.

प्रचार संपल्यानंतर मी बारामती मतदारसंघात थांबू नये, अशी तक्रार भाजपकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली. बारामतीत सभेनंतर माझा काही कार्यक्रम नव्हता. पण बारामतीमध्ये माझे घर आहे, शेती आहे. त्यामुळे मला माझ्या घरी थांबू दिले गेले नाही. माझे मतदान मुंबईत आहे, हे सर्वांना माहीत आहे, असं शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करून सत्ताधाऱ्यांकडून मतदार प्रक्रियेवर परिणाम करण्याची भीती व्यक्त केली. 'मी अनेक मतदारसंघात फिरलो. लोकांचे मत सरकारविरोधी आहे. पण ईव्हीएम हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो किंवा ईव्हीएममध्ये गडबड केली जाऊ शकते, असं पवार यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती