शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

सभेला गर्दी जालन्याची अन् सत्तारांना उमेदवारी हवी औरंगाबादची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 12:08 IST

अब्दुल सत्तारांच्या सभेची गर्दी जरी मोठ्या प्रमाणात असली, तरी या गर्दीचे रुपांतर मतदानात होऊ शकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण म्हणजे गर्दीत असलेले सर्वाधिक लोक सिल्लोड येथील होते. वास्तविक पाहता सिल्लोड विधानसभा मतदार संघ जालना लोकसभेत येतो.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये अजुनही गोंधळाची स्थिती पाहायला मिळत आहे. युतीचे उमेदवार जाहीर झाले असले तरी काँग्रेसमध्ये मात्र अजुनही संभ्रमाचे वातावरण आहे. काँग्रेस नेतृत्वाकडून चंद्रपूर पॅटर्न औरंगाबादमध्ये देखील राबवला जाईल, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी औरंगाबादेत शक्तीप्रदर्शन केले. आमखास मैदानावर सत्तार यांना गर्दी जमविण्यात यश आले. परंतु, ही गर्दी नेमकी कुठली, यावर आता चर्चा रंगत आहेत.

सत्तारांच्या सभेची गर्दी जरी मोठ्या प्रमाणात असली, तरी या गर्दीचे रुपांतर मतदानात होऊ शकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण म्हणजे गर्दीत असलेले सर्वाधिक लोक सिल्लोड येथील होते. वास्तविक पाहता सिल्लोड विधानसभा मतदार संघ जालना लोकसभेत येतो. त्यामुळे सत्तारांचे शक्तीप्रदर्शन जालन्याऐवजी औरंगाबादमध्ये का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सत्तार यांच्या सभेला औरंगाबाद शहरातून हवा तसा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही. कन्नड, सिल्लोड येथील कार्यकर्ते वगळता ग्रामीण भागातून लोकांचा प्रतिसाद हवा तसा दिसला नाही.

काँग्रेस की सत्तार कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील तिकीट वाटपामुळे नाराज असलेले अब्दुल सत्तार यांनी निवडणूक लढविण्याचं ठरवले आहे. मात्र कार्यकर्त्यांचा कौल देखील आपल्यासाठी महत्त्वाचा असून मी काँग्रेसकडून लढवू की अपक्ष अशी विचारणा सत्तार यांनी सभेतून केली. सत्तारांचे बहुतेक कार्यकर्ते हे काँग्रेसमधील आहे. दुसरीकडे काँग्रेसने आपला उमेदवार आधीच निश्चित केला आहे. त्यामुळे सत्तार की काँग्रेस असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Abdul Sattarअब्दुल सत्तारcongressकाँग्रेस