शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

Lok Sabha 2019 Exit Poll: एक्झिट पोलप्रमाणे निकाल असतील का? - शिवसेना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 10:38 IST

जो जनतेचा निर्णय असेल तो आम्ही संपूर्णपणानी नम्रता पूर्वक आणि जी जनतेने जबाबदारी टाकली आहे ती स्वीकारण्याची मानसिकता ठेवून आम्ही स्वीकारू

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी निकालांबाबतचे अंदाज व्यक्त केले. यामध्ये बहुतांश सर्व्हे करणाऱ्या संस्थांनी एनडीए बहुमताचा आकडा पार करताना दाखविला आहे. अर्थातच हे एक्झिट पोल आहेत खरे जे निर्णय येतील आणि ते याच आजच्या एक्झिट पोल प्रमाणे असतील का? अजून काही वेगळे असतील का? अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. 

एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, एक्झिट पोलमध्ये दाखविल्याप्रमाणे अजून काही जास्त चांगले निकाल असतील याचे उत्तर लवकरच आपल्या मिळणार आहे  सर्व एक्झिट पोल पाहिल्यानंतर असे लक्षात येते की जो काही अंतिम निकाल येणार आहे तो २३ मे रोजी येणार आहे. जनतेचा जो काही कौल असेल तो लोकशाही मध्ये आदरपूर्वक स्विकारणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य असते. एनडीएला अत्यंत चांगल्या प्रकारचे यश भारतामध्ये आणि महाराष्ट्रात दाखवलेले आहे त्याबद्दल अर्थातच मनात आनंद वाटत आहे, खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

तसेच जो जनतेचा निर्णय असेल तो आम्ही संपूर्णपणानी नम्रता पूर्वक आणि जी जनतेने जबाबदारी टाकली आहे ती स्वीकारण्याची मानसिकता ठेवून आम्ही स्वीकारू असा विश्वासही शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांचा सर्वसाधारण कौल भाजप-शिवसेना महायुतीला राहील. मात्र, २०१४च्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा काही प्रमाणात वाढतील, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर एक्झिट पोलमध्ये वर्तविला आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३, शिवसेनेने १८, राष्ट्रवादीने ४ तर काँग्रेसने २ जागा जिंकल्या होत्या. एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी जिंकली होती. या वेळी ते महाआघाडीसोबत होते. आजच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे संख्याबळ निश्चितपणे वाढेल, पण ते युतीपासून फारच दूर असेल. दोन आकड्यांमध्ये जागा मिळविण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न हे स्वप्नच राहील, असे दिसते. राज्यात चार महिन्यांनंतर विधानसभा निवडणूक होत असताना लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळताना दिसणे, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासादायक ठरू शकेल.

टॅग्स :Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलShiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेस