शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

Lockdown News: अडीच लाख टन शेतमाल निर्यात; लॉकडाऊनमध्ये ३७५ कोटींची कांदा निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:16 IST

हापूसचीही विदेशवारी, केळीची विक्रमी निर्यात

योगेश बिडवई 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे जगभरातील उद्योग-व्यवसाय ठप्प झाले असताना एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातून विक्रमी ३७५ कोटींची कांदा निर्यात झाली आहे. एवढेच नव्हे कोकणचा राजा हापूस आंब्याची चार हजार मेट्रिक टन निर्यात झाली. राज्य शासनाच्या कृषी पणन मंडळाने स्थापन केलेल्या शेतीमाल निर्यात सनियंत्रण कक्षाच्या समन्वयामुळे एप्रिलमध्ये तब्बल २ लाख ३० हजार ५६५ मेट्रिक टन शेतमालाची निर्यात झाली आहे.

बहुतांश देशात विमान सेवा बंद असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत ही निर्यात केवळ १५ हजार मेट्रिक टन कमी आहे. कांद्याची १ लाख ७० हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाली. यंदा आंबा हंगाम उशीरा सुरू झाला. त्यातच कोरोनाचे संकट आल्याने उत्पादक अडचणीत आले. मात्र आंबा निर्यातीमुळे बागायतदारांना काहीसा दिलासा मिळाला. निर्यातीमुळे स्थानिक बाजारपेठेत भाव मिळण्यासही मदत झाली आहे.सर्व जगालाच पुढचा काही काळ कोविड-१९ सोबत जगावे लागणार आहे. मात्र या संकटात कृषी व पणन विभागाने अडचणींवर मात करत शेतमाल निर्यातीची युरोप व आखाती देशांतील संधी साधली आहे. आपल्या शेतकऱ्यांनी जागतिक दर्जाचे शेतमाल उत्पादन करण्याबरोबरच कोरोनाच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. पणन विभागामार्फत निर्यातदारांना सर्व सुविधा देण्यात येत आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. - अनुप कुमार, प्रधान सचिव, पणन विभागकेळीची विक्रमी निर्यातगेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे सात हजार टन अधिक म्हणजे २२ हजार ५०० टन केळी निर्यात झाली. द्राक्षनिर्यातीनेही सात हजार टनाचा टप्पा गाठला. लिंबुची तर जवळपास चार पट म्हणजे ४४५ टन निर्यात झाली. नारळालाही चांगली मागणी आहे. भाजीपाल्याचीही एक हजार टन अधिक म्हणजे ८,२०१ टन निर्यात झाली.रमजानमुळे फळांना मागणीरमजान महिना सुरू झाल्याने मध्य-पूर्व देशांमधून फळे व भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे कोरोनाचा फळांच्या निर्यातीवर फारसा परिणाम झालेला नाही. द्राक्षे, टरबुज, खरबुज, डाळिंब, केळी आदी फळांची मे अखेरपर्यंत निर्यात सुरू राहील.मसाल्यांना पसंतीभारतातील मसाले युरोप व आखाती देशांमध्ये लोकप्रिय आहेत. एप्रिलमध्ये मिरचीची निर्यात ३०० टनाने वाढून एक हजार टन झाली. बटाटे, आले, लसूण, मसाल्याच्या पदार्थांनाही पसंती आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस