शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

Lockdown in Maharashtra: लवकरच नवा नियम; किराणा दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 06:17 IST

Lockdown in Maharashtra: कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन छोटे जिल्हे, तसेच रोजचा मंत्रालयात संबंध होत नसलेले दुर्गम भागातील जिल्हाधिकारी यांच्या भागात जिल्ह्याच्या पालक सचिवांनी अधिक कार्यक्षमतेने काम करणे गरजेचे आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : किराणा सामान खरेदी करण्याच्या नावाखाली लोक दिवसभर फिरताना दिसतात. त्यावर पायबंद घालण्यासाठी राज्य स्तरावरून कठोर निर्णय घेतला जावा, त्यासाठी राज्यभरातील किराणा सामानाची दुकाने सकाळी सात ते सकाळी अकरा या वेळेत चालू ठेवण्याचा निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्याबद्दलचे आदेश मंत्रालयातून लवकरच काढले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन छोटे जिल्हे, तसेच रोजचा मंत्रालयात संबंध होत नसलेले दुर्गम भागातील जिल्हाधिकारी यांच्या भागात जिल्ह्याच्या पालक सचिवांनी अधिक कार्यक्षमतेने काम करणे गरजेचे आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ३० एप्रिलपर्यंत आणखी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशीही बैठकीत चर्चा  झाली. महाराष्ट्रात तयार होणारा १,२५० मेट्रिक टन ऑक्सिजन पूर्णपणे वैद्यकीय सेवेसाठी वापरला जात असून, ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन बाहेरून आणला जात आहे. ऑक्सिजन टँकरच्या साहाय्याने ट्रेनमधून ऑक्सिजन आणण्याची सुरुवात आपण केली आहे. सोमवारी रात्री एक ट्रेन रवाना झाली आहे. सोमवारी आपण १,५५० मेट्रिक टनापर्यंत गेलो आहोत. केंद्र सरकारने एप्रिलपर्यंत १,८०० मेट्रिक टनापर्यंत आपण जाऊ, असे सांगितले आहे, पण रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली, तर ३० तारखेनंतर ऑक्सिजनची अडचण होऊ शकते. भविष्यात ऑक्सिजनची गरज वाटली, तर काय करायचे, यावरही बैठकीत चर्चा झाली. त्यासाठी एएसयू आणि पीएसयू या दोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन तयार करणारे युनिट उभे करावेत, यावरही निर्णय झाल्याचे टोपे म्हणाले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर यासाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे, त्यासाठी कोणाच्या परवानगीची त्यांना गरज नाही. ऑक्सिजनच्या उभारणीसाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ न घालवता हे निर्णय अंमलात आणावेत, अशा सूचना त्यांना दिल्याचे टोपे म्हणाले. त्यासाठी विनाटेंडर ते काम करू शकतील. रेमडेसिविरसाठीही केंद्र सरकारने सात कंपन्यांना नवीन वीस प्लांट उभे करण्याची परवानगी दिली आहे, येत्या काही दिवसांत  त्यांची अडचणही दूर होईल, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी काही विचारले की, किराणा सामान घ्यायला जात आहे, अशी उत्तरे दिली जातात व विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. किराणा मालाची दुकाने सकाळी सात ते सकाळी अकरा एवढ्या वेळेत चालू ठेवावी. जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर हा निर्णय होऊ नये, मंत्रालयातूनच त्या विषयीचे आदेश काढले जातील.     - राजेश टोपे, आरोग्यमंत्री

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे