शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लॉकडाऊनमुळे ४३ टक्के सामान्य नैराश्याच्या गर्तेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 06:20 IST

अभ्यासातील निष्कर्ष : निरुत्साह, सतत कंटाळा, झोपेच्या समस्यांनी अनेक जण झाले त्रस्त

स्नेहा मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मागील पाच महिन्यांमध्ये ४३ टक्के सामान्य नैराश्याच्या गर्तेत अडकल्याचे धक्कादायक वास्तव एका अभ्यासातून समोर आले आहे. मानसिक आरोग्याविषयी केलेल्या या अभ्यासानुसार, २६ टक्के सामान्य लोकांना नैराश्याची (डिप्रेशन) सौम्य लक्षणे असल्याचे समोर आले, तर ११ टक्के लोकांनी काही प्रमाणात नैराश्य आल्याचे म्हटले आहे. याशिवाय सहा टक्के लोकांमध्ये नैराश्याची तीव्र लक्षणे दिसून येत आहेत. मानसिक आरोग्याविषयीचा हा अभ्यास ‘गोकी’ या स्मार्ट हेल्थ इकोसिस्टिमचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने केला आहे.

सध्याचा लॉकडाऊनचा काळ सामान्य लोकांसाठी मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही कठीण जात आहे. कोरोनाची भीती, लॉकडाऊन, रोजगार नसल्याची किंवा थांबल्याची चिंता, आरोग्यविषयक समस्या, आजूबाजूचे वातावरण, सेप्रेशन अ‍ॅन्झायटी अशा अनेक समस्यांमुळे मानसिक ताण वाढताना दिसत आहे. मानसिक ताण हा नैराश्यावस्थेत रूपांतर घेत असतो, असे या अभ्यासात म्हटले आहे.अहवालानुसार, ५७ टक्के व्यक्तींना दररोज निरुत्साही वाटणे, सतत कंटाळा येणे, झोपेची समस्या उद्भवणे किंवा जास्त वेळ झोपणे अशा तक्रारी उद्भवत आहेत.

लॉकडाऊनमुळे बहुतांश व्यक्तींचे झोपेचे वेळापत्रक बिघडल्याचे समोर आले आहे. या अभ्यासानुसार, मानसिक स्वास्थ्याचे संतुलन राखण्यासाठी ध्यानधारणा, योग वा व्यायाम करणे गरजेचे आहे. पाच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सामाजिक, आर्थिक बदल होत आहेत. या परिस्थितीला सामोरे कसे जायचे, हा प्रश्न पडतो. हाच भावनिक आवेग इतका जोरदार असतो की त्यातून या काळात मानसिक आधाराची गरज वाटते. अशा वेळी मनातील भावना, ताण व्यक्त करायला हवा. ही परिस्थिती स्वीकारून भावनिक, मानसिक सहनशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या परिस्थितीशी दोन हात करताना सकारात्मक बाजू तपासून घ्यायला हव्यात, असे मानसोपचातज्ज्ञ डॉ. नितीन जैन यांनी सांगितले.उपाय आहे, घाबरू नका!एखाद्या भळभळत्या जखमेएवढीच तीव्र यातना देणारा, पण कुणाला न दिसणारा हा आजार आहे. दु:ख विसरावे, सहन करावे असा त्रासदायी गैरसमज आहे. नैराश्यासाठी विशिष्ट औषधे असून ती परिणामकारक आणि सुरक्षित आहेत. नैराश्यात समुपदेशनाचा विशेष उपयोग होतो. पण समुपदेशकांशी नुसत्या गप्पा मारून निराशा कमी होते हा खूप मोठा गैरसमज आहे. समुपदेशन म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच असते, त्यात रुग्णाला मेहनत घ्यावी लागते. नैराश्याचे प्रमाण कमी असेल, योग्य प्रशिक्षित समुपदेशक असेल आणि सांगितलेले बदल करण्याची रुग्णात क्षमता असेल तर समुपदेशनाचा चांगला उपयोग होतो. समुपदेशन डोळसपणे घ्यावे. अन्यथा त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात. औषध आणि समुपदेशन, दोन्ही एकत्र घेणे योग्य आहे.- डॉ. नवीन शाह, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस