शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

विधानसभेला मविआ एकसंघ राहायला हवी, जर नाही राहिली तर...; शरद पवारांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 14:34 IST

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका सुरू झाल्यात. त्यात शरद पवारांनी हे भाष्य केले आहे. 

छत्रपती संभाजीनगर - लोकसभा निवडणुकीत राज्यात जसा निकाल लागला, त्यावरून विधानसभा निवडणुकीतही राज्यात लोकांना बदल हवाय. मविआ ज्यारितीने एकसंघ राहून लोकसभा लढली तशी विधानसभेला राहायला हवी, जर नाही राहिली तर आजच्या राज्यकर्त्यांना फटका बसेल पण लोकसभा इतका स्पष्ट निकाल लागला तर मला आनंद होईल असं सूचक विधान शरद पवारांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतही लोकांना बदल हवाय. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना लोकसभेला ज्यारितीने आम्ही एकसंघपणे लढलो तसं विधानसभेला ती एकसंघ येण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु त्याला मूर्त स्वरुप येणे गरजेचे आहे. हे आलं तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल. जर नाही आले तर आजच्या राज्यकर्त्यांना किंमत मोजावी लागेल पण लोकसभा इतका स्पष्ट निकाल लागला तर मला आनंद होईल. लोकसभा निवडणुकीला भाजपाच्या काही नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेत आम्हाला ४०० जागा हव्यात, संविधानात बदल करायची अशी जाहीर भूमिका मांडली. त्यामुळे लोकांच्यात अस्वस्थता होती. या देशात संविधानाने मुलभूत अधिकार दिला आहे. त्या अधिकारांवर गदा येण्याची भीती लोकांमध्ये होती. त्यामुळे या विरोधात मतदान करण्याचा निर्धार जनतेने केला. त्यातून ४०० वरून २७० वर जागा आल्यात असं त्यांनी सांगितले. 

तसेच मविआच्या बैठकांना सुरूवात झालीय, तिन्ही पक्षांनी ताळमेळ राहावा यासाठी काही नावं समोर आणलीत, संसदेच्या अधिवेशनानंतर पुढील बैठका होतील. काहीही झालं तरी जागांबाबत एकवाक्यता करावी, लोकांना चांगला पर्याय द्यावा यासाठी मविआत एकमत आहे. ३ पक्ष जसे महत्त्वाचे तसे डावे पक्ष ज्यांनी लोकसभेत एकही जागा न मागता राज्यात सहकार्य केले. त्यांना काही जागा सोडाव्यात अशी माझी सूचना आहे. जेव्हा चर्चेला सुरुवात होईल तेव्हा त्यातून मार्ग निघेल असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.

..तोपर्यंत केंद्र सरकारला धोका नाही

चंद्राबाबू, नितीश कुमार यांच्या मदतीनं या सरकारची स्थिरता आहे. हे दोघेही पार्टनर जोपर्यंत मोदींसोबत आहेत तोपर्यंत केंद्र सरकारला धोका नाही. गेली १० वर्ष सर्व सत्ता मोदींच्या हाती होती आणि आता या सत्तेत वाटेकरी आलेत. त्यामुळे काही दिवसांत काय परिस्थिती असेल ते कळेल. एका मुठीत आता सरकार नाही असं शरद पवारांनी म्हटलं.

आमदारांच्या घरवापसीचा निर्णय पक्षात चर्चा करूनच होईल

काही लोकांनी पुन्हा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण सरसकट सगळ्यांना घेण्याची मनस्थिती आमची नाही. जे लोक विचारांनी आमच्यासोबत होते, एकत्रित काम करण्याची मानसिकता त्यांची आहे. त्यांना फारसा कुणाचा विरोध असण्याची शक्यता नाही. मात्र काही जण असे आहेत ज्यांनी आमच्याविरोधात बरीच टोकाची भूमिका घेतली त्यांच्याबद्दल काय करावं, याची चर्चा आमच्या पक्षात होईल आणि त्यावर निर्णय होईल अशी माहिती शरद पवारांनी दिली. 

लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेवरून टोला

निवडणुकीसाठी राज्य सरकारकडून अनेक घोषणा दिल्या गेल्यात, सरकारच्या तिजोरीत काय नाही मग देणार कुठून, निवडणुकीच्या आधी एखाद दुसरा हफ्ता देण्याचा प्रयत्न होईल. त्यातून जनमानस आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न दिसतोय. मात्र लोकांच्या मनात हीदेखील चर्चा आहे की इतके दिवस सत्तेत असताना असे निर्णय का घेतले नाही. हे निवडणुकीसाठी तात्पुरतं आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे त्याचा काही ना काही परिणाम होईल असं सांगत शरद पवारांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेवर टोला लगावला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे