शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

केडीएमसीचे मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण यांची चौकशी करा सभागृह नेते राजेश मोरेंचे आयुक्त पी.वेलारसू यांना पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 6:40 PM

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असून त्याला मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण हे जबाबदार असून त्यांची चौकशी करुन तातडीने कारवाई करावी, तसेच ज्या अधिका-यांना ३ वर्षे झाली आहेत अशा अधिका-यांना शासनाकडे परत पाठवावे, जेणेकरुन महापालिकेवरील आर्थिक बोजा कमी होण्यास सहाय्य होईल अशी मागणी सभागृह नेते राजेश मोरे यांनी आयुक्त पी.वेलारसू यांना केली

ठळक मुद्देनियमानूसार काम केल्याने काही जण दुखावतात- चव्हाण

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असून त्याला मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण हे जबाबदार असून त्यांची चौकशी करुन तातडीने कारवाई करावी, तसेच ज्या अधिका-यांना ३ वर्षे झाली आहेत अशा अधिका-यांना शासनाकडे परत पाठवावे, जेणेकरुन महापालिकेवरील आर्थिक बोजा कमी होण्यास सहाय्य होईल अशी मागणी सभागृह नेते राजेश मोरे यांनी आयुक्त पी.वेलारसू यांना केली आहे.तसे पत्र मोरेंनी मंगळवारी आयुक्तांना पाठवले असून मागील तीन वर्षात महापालिकेची आर्थिक स्थिती नाजुक झालेली आहे, त्यासंदर्भात सातत्याने आवाज उठवला असून त्याचा काहीही परिणाम होत नाही. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतांना त्याची जाणिव चव्हाण यांना नाही. २०१० च्या अर्थसंकल्पाचा आढावा घेतल्यास त्यातील अनेक त्रुटी स्पष्ट होतील. तेव्हाची कामे अजून सुरु असून कामांचा कालावधी संपल्यावरही वाढीव काम असे सांगितले जात आहे. चव्हाण यांच्या कामाची अजब पद्धत असल्याचा आरोप मोरे यांनी केला.केडीएमसीची निवड स्मार्टसिटी प्रकल्पात झाली, त्यासाठी पहिल्या टप्प्याचा निधी १५० करोड रुपये प्राप्त झाले. ही रक्कम गुंतवणूक करतांना मार्गदर्शक तत्व काय होती. ती गुंतवणूक करतांना पाळली गेली की नाही? ज्या बँकेत गुंतवणूक केली तिथे व्याजदर हा अन्य बँकांच्या तुलनेत कसा आहे याची तुलना कशी केली गेली याबाबतचा तपशील मिळू शकेल का? अशीही विचारणा मोरेंनी पत्रात केली आहे. असा सर्वांगिण विचार करुन महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत करणा-या अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.त्यामुळे जे अधिकारी ३ वर्षांसाठी येतात त्यांची तातडीने बदली करावी, आधीच डबघाईत असलेल्या महापालिकेवरचा बोजा कमी करावा असेही त्यांनी म्हंटले. कोणतीही विकास कामे होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या असंतोषाचा सामना लोकप्रतिनिधींना करावा लागतो. अशा स्थितीमुळे सशक्त लोकशाही कशी होईल असा सवालही त्यांनी केला.- मी शासनाच्या नियमावलीला सुसंगत पद्धतीनेच काम करतो. त्यामुळेच कोणालाही बील देतांना नियमावली पाळावी असा माझा आग्रह असतो, कदाचित त्यामुळेच काहीजण दुखावले जात असतील. माझा केडीएमसीतील कार्यकाळ संपुष्टात आला असून शासनाने बदली केल्यास मी तात्काळ चार्ज सोडेन - दिग्विजय चव्हाण, मुख्य लेखा अधिकारी, केडीएमसी

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण