शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

आम्हाला जमीन दाखवणाऱ्या भाजपला अस्मान दाखवू; अमित शाह यांच्या हल्ल्यावर उद्धव ठाकरे यांचा प्रतिहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 11:20 IST

ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्रिपद जर मला पाहिजे असते तर एका क्षणात मी ते सोडले नसते.

मुंबई : मुंबईत मंगलमूर्ती विराजमान झालेल्या आहेतच. काल एक अमंगल मूर्ती आले होते. शिवसेनेला जमीन दाखवायची आहे, असे ते बोलून गेले. त्यांना काय बोलायचे ते बोलू देत, पण आपण भाजपला पालिका निवडणुकीत अस्मान दाखवू, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणावर दिली.

ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी मुंबईतील विभागप्रमुखांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमित शाहचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला जमीन दाखवायची भाषा अमित शाह यांनी केली. त्यांना गणपतीच्या मंडपातही राजकारण दिसते. ते शिवसेना संपवायला निघाले आहेत, पण या संघर्षाच्या काळात जो सोबत राहतो तो आपला. 

यावेळी भास्कर जाधव, अनिल परब, रवींद्र वायकर, सुनील प्रभू व अन्य आमदार उपस्थित होते. त्यांच्याकडे निर्देश करताना ते म्हणाले की, याही आमदारांना ते लालूच दाखवून नेऊ शकत होते, पण ते नेऊ शकले नाहीत. कारण निष्ठा हा असा विषय असतो की, त्याची कितीही किंमत लावली, तरी ती विकली जाऊ शकत नाही.

...तर क्षणात मुख्यमंत्रिपद सोडले नसतेठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्रिपद जर मला पाहिजे असते तर एका क्षणात मी ते सोडले नसते. आपल्यासोबत तीस ते चाळीस आमदार होते. मीही त्यांना डांबून ठेवून शकलो असतो. माझीही  ममता बॅनर्जींकडे ओळख होती. मीही त्यांना कोलकात्याला  घेऊन जाऊ शकलो असतो. राजस्थानला नेले असते, पण माझा तो स्वभाव नाही. 

दसरा मेळाव्यात काय बोलायचे ते बोलणार -राहायचे असेल तर निष्ठेने राहायचे. मनात शंका-कुशंका घेऊन राहायचे नाही. ज्यांना राहायचे त्यांनी निष्ठेने राहा, पण एक समाधान आहे की, माझ्यासोबत जे आहेत ते कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. हेच आपले शिवसेनेचे वैभव आहे. दसरा मेळाव्यात आपल्याला काय बोलायचे ते बोलणारच आहे, आता तर मुख्यमंत्रिपदाचा मास्कही नसेल, असा इशारा ठाकरे यांनी दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहBJPभाजपा