शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 06:23 IST

लोकसभेनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, शरद पवार यांच्या दाव्याने खळबळ; विरोधकांकडून मात्र टीकेचे सूर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत केला आहे. पुढील दोन वर्षांत विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष त्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

 नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचनी पडणे, हे आमच्यासाठी अवघड असल्याचेही पवार म्हणाले. १९७७ मध्ये विविध पक्ष एकत्र आले होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता पक्षाची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले. विरोधकांनी तेव्हाही पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाई यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. आता मोरारजी देसाईंपेक्षा राहुल गांधींना जास्त जण स्वीकारतात. समविचारी लोकांना एकत्र आणण्याबाबत राहुल यांनी चर्चाही केली असल्याचे पवार म्हणाले.

एकनाथ शिंदे : औपचारिकता बाकी आहेशरद पवार काही सूचक वक्तव्य करत असतात. औपचारिकता बाकी आहे. उद्धवसेनेचे सध्या काँग्रेसीकरण झाले आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस : उद्धवसेनाही सोबत जाईललोकसभेनंतर पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही. त्यामुळे ते त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. उद्धवसेनाही काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

अजित पवार : त्यांच्यासाठी हे काही नवे नाहीशरद पवारांनी यापूर्वीदेखील आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. शरद पवारांसाठी पक्ष विलीन करणे नवे नाही. ८ डिसेंबर १९८६ रोजी शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आयमध्ये विलीन केला होता. आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार होतो, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

त्यांना पक्षात नो एन्ट्रीज्या लोकांनी मोदींसोबत जाण्यासाठी पक्ष सोडला, त्यांना जनता पसंत करत नाही. पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळी एकत्र साजरी करतात. मात्र, राजकीयदृष्ट्या त्यांना परत यायचे असेल, तर आम्ही त्यांना स्वीकारणार नाही, असेही शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता स्पष्ट केले.

नाना पटोले : शरद पवार सांगतात त्यात तथ्य आहेदेशपातळीवर चर्चा चालू आहे. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी पुण्याला आले होते, तेव्हा राहुल गांधींनी मला सांगितले होते की अनेक पक्षांचा विलिनीकरणाचा प्रस्ताव आहे. देशात भाजपच्या तानाशाही विरोधात एकत्र येऊन काँग्रेसच्या नेतृत्वात रहावे, अशा पद्धतीची भूमिका अनेक प्रादेशिक पक्षांनी मांडल्याचे मला राहुल गांधींनी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवार जे काही सांगतात त्यात तथ्य आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४