शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देऊया; मनसे नेत्यांच्या बैठकीत सूर, राज ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 13:22 IST

मी आगामी काळात मेळावा घेणार आहे. लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. जागोजागी जाईन लोकांना भेटेन असं राज ठाकरेंनी म्हटलं.

मुंबई  - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची बैठक राज ठाकरेंनी बोलावली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देऊया असा सूर उमटल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात आज दादरच्या शिवसेना भवनासमोर काही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. आता तरी राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद घातली होती.

मनसे नेत्यांच्या बैठकीत काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, शिवसेना फुटली आणि भाजपासोबत गेली. त्यानंतर कुठेतरी ठाकरे ब्रँड कायम राहावा यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांकडून मागणी होऊ लागली आहे. याआधी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत आणि त्यानंतरच्या विधानसभेतही मनसे-शिवसेना एकत्र येण्याची चर्चा झाली होती. तेव्हा राज ठाकरेंनी उघडपणे आमच्याकडून कुठलीही अडचण नाही. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी साथ दिली नाही. मात्र काल राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली होती.

या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यात मराठी माणसांच्या हितासाठी, ठाकरे ब्रॅंड जपण्यासाठी दोन्ही बंधूंनी एकत्र यावे अशी विनंती राज ठाकरेंसमोर मांडली. ही जनभावना असल्याचे नेते म्हणाले. कार्यकर्त्यांचीही ही मागणी असल्याचे राज ठाकरेंना सांगण्यात आले. त्यावर राज ठाकरेंनी कुठलेही भाष्य केले नाही. परंतु ते म्हणाले, त्यांच्या पक्षात सध्या काय चाललंय ते चालू द्या. बैठका होऊ द्या, घडामोडी घडू द्या. आपण एकला चलो रेच्या माध्यमातून काम केले पाहिजे. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. त्यांच्या घडामोडी पूर्ण झाल्यावर जो काही निर्णय व्हायचा असेल तो होईल. तुम्ही काम करा. काम करू, पुढे काय होतंय ते पाहू असं सांगत राज ठाकरेंनी स्पष्ट भूमिका न मांडता पक्षातील नेत्यांना काम करण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्रातील घडामोडीवर मेळाव्यात बोलेन – राज ठाकरे

राज्यात गेल्या २ अडीच वर्षापासून जे राजकारण सुरू आहे. ते दिवसेंदिवस किळसवाणे होत आहे. या लोकांना मतदारांशी काही देणेघेणे नाही. पक्षाचे मतदार पक्षाला का मतदान करत होते याचा विसर पडलाय. लोकांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. मी आगामी काळात मेळावा घेणार आहे. लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. जागोजागी जाईन लोकांना भेटेन. शरद पवार किती काही म्हणत असले त्यांचा संबंध नाही. पण दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल असेच जाणार नाहीत. सुप्रिया सुळे उद्या केंद्रात मंत्री झाल्यावर आश्चर्य वाटणार नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत असे बॅनर लागले आहेत. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी या सर्व प्रकारावर मी मेळाव्यात बोलेन असं सांगत पक्षाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे सूचक विधान केले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार