शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

उन्हाळी कांदा लागवडीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:08 PM

मेशी : यावर्षी देवळा पूर्व भागातील सर्व कांदा चाळी रिकाम्या आहेत. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता, त्यामुळे जेमतेम पावसाळी कांद्याचे उत्पादन झाले होते. परंतु पाण्याअभावी मात्र उन्हाळी कांद्याचे उत्पादन अजिबात झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, बळीराजा कमालीचा आर्थिक कोंडीत सापडला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची भीषणता एवढी भयानक

मेशी : यावर्षी देवळा पूर्व भागातील सर्व कांदा चाळी रिकाम्या आहेत. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता, त्यामुळे जेमतेम पावसाळी कांद्याचे उत्पादन झाले होते. परंतु पाण्याअभावी मात्र उन्हाळी कांद्याचे उत्पादन अजिबात झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, बळीराजा कमालीचा आर्थिक कोंडीत सापडला आहे.या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. या वर्षी दुष्काळाची भीषणता एवढी भयानक आहे की जनावरांना चारा आणि पाणी पुरविणेसुद्धा अवघड झाले आहे. चारा आणि पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे.दरवर्षी या दिवसांत कांदा चाळी भरलेल्या दिसत. मात्र या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने चाळी रिकाम्या आहेत. तसा देवळा पूर्व भाग नेहमीचाच कमी पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो; परंतु या वर्षी तर दुष्कळाची भीषणता भयानक रूप आहे.त्याचा परिणाम लग्न सराईवरदेखील झाला आहे. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी या वर्षी उपवर मुलामुलींचे लग्न थांबविले आहेत.