शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

बालभारतीमध्ये ‘माळीण’वर धडा

By admin | Updated: June 7, 2015 01:36 IST

‘माळीण’ गावावर पावसाळ्यात डोंगर कोसळून ओढवलेल्या आपत्तीने संपूर्ण देश हादरला होता.

संजय कांबळे,  बिर्लागेट -मागील वर्षी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ‘माळीण’ गावावर पावसाळ्यात डोंगर कोसळून ओढवलेल्या आपत्तीने संपूर्ण देश हादरला होता. या दुर्घटनेची दखल राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवर घेण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनादेखील अशा आपत्तीची माहिती व्हावी, तसेच अशा वेळी सामना कसा करावा, याकरिता राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने यंदा नवीन अभ्यासक्रमांतर्गत मराठी माध्यमाच्या पाचवीच्या मराठी बालभारती पुस्तकात ‘माळीण गाव... एक घटना’ या धड्याचा समावेश केला आहे.भीमाशंकर परिसरात आणि डिंबा धरणाजवळ २९ जुलै २०१४ ला माळीण दुर्घटना घडली. पाऊस सुरू असताना डोंगर कोसळून होत्याचे नव्हते झाले. एक संपूर्ण गाव गाडले गेले. बचावकार्यादरम्यान १५१ मृतदेह सापडले. आठ दिवस बचावकार्र्य सुरू होते. देशाच्या गृहमंत्र्यांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच घटनास्थळी दौरा करून सरकारी मदतीच्या घोषणा केल्या. मात्र, त्या हवेत विरल्या असून आजही गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे.दुर्घटनेनंतर घटना का घडली, तिला जबाबदार कोण, यावर बराच काथ्याकूट झाला. मात्र, आजपर्यंत नेमके कारण कोणालाच सांगता आले नाही. डोंगरावरील शेती, त्यासाठी डोंगरमाथ्यावर खोदण्यात आलेले तलाव, सह्याद्री पर्वतरांगांमधील बेसुमार वृक्षतोड आदी कारणे दुर्घटनेसाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.ही सर्व घटना, घडामोडी, कारणे, उपाय या धड्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. पाचवीच्या पुस्तकात बारावा धडा ‘माळीण एक घटना’, पृष्ठ क्रमांक ३६ वर असून धड्याखाली विचारलेल्या प्रश्नांमुळे नैसर्गिक आपत्तीला नेमके जबाबदार कोण तसेच पाणी, वृक्ष, डोंगर यासारखे घटक आपल्या दैनंदिन जीवनावर कसे प्रभाव टाकून आहेत, हे समजून घेण्यास या धड्याची नक्कीच मदत होणार आहे.आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक असतात. त्यामुळे घडून गेलेल्या आपत्तीतून नेमका काय धडा घ्यायचा, याचे शिक्षण त्यांना मिळाले तर भविष्यात अशा आपत्ती टाळता येऊ शकतील किंवा त्यांची तीव्रता कमी होऊ शकते. - एस.जे. कांबळे, पालक, वरप, ता. कल्याणसर्व पाचवीच्या विद्यार्थ्यांना यानिमित्ताने माळीण गावची ओळख होईल व ही घटना त्यांच्या बौद्धिक स्तरावर जाऊन सोप्या भाषेत समजाविण्यासाठी या धड्याचा उपयोग होईल. - एक शिक्षक, जि.प. शाळा, कल्याणही घटना घडल्यानंतर १४ आॅगस्ट २०१४ रोजी आम्ही माळीण गावास भेट दिली. १५ आॅगस्टचा स्वातंत्र्य दिन वाचलेल्या लोकांबरोबर साजरा केला. त्या वेळी त्यांच्याकडून या आपत्तीची भीषणता समजली. आजही त्यांचे पुनर्वसन झालेले नाही.- किशोर तांबे, शहाजी जाधव, सा. कार्यकर्ते, पाथर्ली, कल्याण