शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

बदलापूर : चामटोलीच्या जंगलात दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 5:44 PM

चंदेरीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या चामटोली गावाच्या परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्यानं चामटोलीतील शेतक-याच्या बक-यादेखील फस्त केल्या आहेत.

बदलापूर - चंदेरीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या चामटोली गावाच्या परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्यानं चामटोलीतील शेतक-याच्या बक-यादेखील फस्त केल्या आहेत. या जंगलात बिबट्या नामशेष झाले होते. मात्र आता पुन्हा बिबट्या या भागात आल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच वन विभागाच्या अधिका-यांनी परिसराची पाहणी केली असता बिबट्यासोबत त्याचे दोन बछडेदेखील असल्याची स्पष्ट केले आहे. 

चंदेरीच्या पर्वत रांगेत पूर्वी वन्य जिवांचा मोठ्या प्रमाणात वावर होता. बिबटेदेखील या भागात होते. मात्र गेल्या 20 ते 25 वर्षात या भागात ग्रामस्थांना कधी बिबट्याचा वावर जाणवला नाही. मात्र गेल्या महिन्याभरापासून या भागात एक बिबट्या बक-यांची शिकार करत असल्याचे शेतक-यांच्या लक्षात आले. रानात चरण्यासाठी गेलेल्या बक-यांपैकी काही बक-यांची शिकार या बिबटय़ाने केली होती. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. चामटोली भागातील जंगलात हा बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांना जंगलात जाताना सतर्क राहण्याचे आदेश वन विभागाने दिले आहे. तर बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ मात्र चिंतेत आहेत. या भागात बिबट्या फिरत असला तरी त्याने अद्याप मानवी वस्तीत हल्ला चढवलेला नाही. या भागातील जंगलात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात असल्याने या बिबटय़ाला मुबलक शिकार मिळत आहे. मात्र रानडुक्करची शिकार करतांना या बिबट्याला बक-या दिसल्याने त्याने ही शिकार केल्याचे वन विभागाचे अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी स्पष्ट केले. या बिबट्याचा ग्रामस्थांना सध्या तरी कोणताच धोका असल्याचे दिसत नाही. मात्र ग्रामस्थांनी जंगलात जाताना दक्षता घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

चामटोली भागात बिबट्या आल्याची चर्चा असताना गुरुवारी वन विभागाच्या अधिका-यांनी चामटोली येथील ताण गावाच्या परिसरात पाहणी केली. यावेळी बिबट्याच्या पायांचे ठसेदेखील त्यांना सापडले आहेत. तर काही आदिवासीयांनी दोन बछड्यांसह या बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. तर एका शेतक-याने बिबट्या पाणी पितानादेखील पाहिले आहे. या शेतक-यांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केलेला असतानाच आता वन विभागाने देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे. बिबट्या हा या जंगलात पुन्हा आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्या शेतक-यांच्या शेळळ्या ह्या बिबट्याने खाल्ले आहेत त्यांना भरपाई देण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. 

‘‘भीमाशंकरच्या जंगलातून हे बिबटे या भागात आल्याची शक्यता आहे. बछड्यांसह हा बिबटा फिरत असल्याने हे जंगल त्यांच्यासाठी सुरक्षित वाटत असेल. गावाच्या जवळच बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याचा वावर हा नैसर्गिक असल्याने ग्रामस्थांनीच काळजी घेणो गरजेचे आहे''. - चंद्रकांत शेळके, वनअधिकार.