शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:28 IST

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून अलीकडे एकमेकांच्या अधिक जवळ आलेले

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून अलीकडे एकमेकांच्या अधिक जवळ आलेले विरोधक आणि त्याचवेळी दुरावलेले सत्तारूढ पक्ष असा सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्र्यांना लक्ष्य करण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे.‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे उत्साहित असलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमला तब्बल २२ दिवसांच्या कामकाजात विरोधकांच्या ‘हल्लाबोल’ंला सामोरे जावे लागणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ९ मार्च रोजी २०१८-१९ चा राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करतील.धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांची मंत्रालयातील आत्महत्या, कर्जमाफी देण्यात झालेला विलंब, त्यात मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने घातलेला घोळ, बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदतीत विलंब, कीटकनाशकांच्या फवारणीमुळे झालेले शेतकºयांचे मृत्यू आणि सरकारने देऊ केलेली तोकडी मदत हे मुद्दे विरोधकांच्या भात्यात असतील. धर्मा पाटील प्रकरणावरून पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे विरोधकांच्या रडारवर असतील. त्यांच्याविरुद्ध आणखी काही आरोप केले जाणार आहेत.राज्यावरील ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज, आर्थिक वर्ष संपण्यास एक महिना उरलेला असताना गेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील ५० टक्केही निधी खर्च न होणे, राज्य सरकारी कर्मचाºयांचा सातवा वेतन आयोग हे मुद्दे विरोधकांच्या मदतीला असतील. कोरेगाव भीमातील घटना, संभाजी भिडे-एकबोटेंबाबत सरकारची भूमिका, राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती यावरून विरोधक मुख्यमंत्र्यांना घेरतील.शालार्थ ही प्रणाली कोलमडल्याने शिक्षक, कर्मचाºयांचे थकलेले वेतन यासह विविध मुद्द्यांवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर विरोधक निशाणा साधतील तर शिष्यवृत्ती वाटपात झालेल्या अभूतपूर्व घोळासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि ओबीसी विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागेल.सत्तारूढ भाजपा-शिवसेनेतील संबंध सध्या ताणले गेले आहेत. शिवसेनेने पुढील निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. बाहेर शिवसेना मोदी-अमित शहांपासून सर्वांवर सडकून टीका करीत असली तरी राज्य सरकार चालविताना मुख्यमंत्री फडणवीस बरोबर जुळवून घेतात, असा अनुभव आहे. त्याची पुनरावृत्ती या अधिवेशनात होईल का याबाबत उत्सुकता असेल.मुख्यमंत्र्यांचे चहापान उद्याअधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना रविवारी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर चहापानासाठी निमंत्रित केले आहे. तत्पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांची संयुक्त बैठक दुपारी होणार असून तीत चहापानावरील बहिष्काराबाबत निर्णय घेण्यात येईल.विधानसभा आणि विधान परिषदेत एकाच प्रकारचे आरोप करून पुनरावृत्ती करण्याऐवजी वेगवेगळे आरोप करून सरकारची कोंडी करण्याची विरोधकांची खेळी असेल.प्रत्येक आठवड्यात एक प्रस्ताव चर्चेसाठी आणत आरोपांची राळ उडवायची आणि सरकारला लक्ष्य करायचे अशीही विरोधकांची योजना आहे.किमान तीन मंत्र्यांविरुद्ध घोटाळ्यांचे नवीन आरोप करण्यासाठीची ‘सामग्री’ विरोधकांनी तयार ठेवली आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना