शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:28 IST

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून अलीकडे एकमेकांच्या अधिक जवळ आलेले

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून अलीकडे एकमेकांच्या अधिक जवळ आलेले विरोधक आणि त्याचवेळी दुरावलेले सत्तारूढ पक्ष असा सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्र्यांना लक्ष्य करण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे.‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे उत्साहित असलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमला तब्बल २२ दिवसांच्या कामकाजात विरोधकांच्या ‘हल्लाबोल’ंला सामोरे जावे लागणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ९ मार्च रोजी २०१८-१९ चा राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करतील.धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांची मंत्रालयातील आत्महत्या, कर्जमाफी देण्यात झालेला विलंब, त्यात मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने घातलेला घोळ, बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदतीत विलंब, कीटकनाशकांच्या फवारणीमुळे झालेले शेतकºयांचे मृत्यू आणि सरकारने देऊ केलेली तोकडी मदत हे मुद्दे विरोधकांच्या भात्यात असतील. धर्मा पाटील प्रकरणावरून पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे विरोधकांच्या रडारवर असतील. त्यांच्याविरुद्ध आणखी काही आरोप केले जाणार आहेत.राज्यावरील ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज, आर्थिक वर्ष संपण्यास एक महिना उरलेला असताना गेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील ५० टक्केही निधी खर्च न होणे, राज्य सरकारी कर्मचाºयांचा सातवा वेतन आयोग हे मुद्दे विरोधकांच्या मदतीला असतील. कोरेगाव भीमातील घटना, संभाजी भिडे-एकबोटेंबाबत सरकारची भूमिका, राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती यावरून विरोधक मुख्यमंत्र्यांना घेरतील.शालार्थ ही प्रणाली कोलमडल्याने शिक्षक, कर्मचाºयांचे थकलेले वेतन यासह विविध मुद्द्यांवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर विरोधक निशाणा साधतील तर शिष्यवृत्ती वाटपात झालेल्या अभूतपूर्व घोळासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि ओबीसी विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागेल.सत्तारूढ भाजपा-शिवसेनेतील संबंध सध्या ताणले गेले आहेत. शिवसेनेने पुढील निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. बाहेर शिवसेना मोदी-अमित शहांपासून सर्वांवर सडकून टीका करीत असली तरी राज्य सरकार चालविताना मुख्यमंत्री फडणवीस बरोबर जुळवून घेतात, असा अनुभव आहे. त्याची पुनरावृत्ती या अधिवेशनात होईल का याबाबत उत्सुकता असेल.मुख्यमंत्र्यांचे चहापान उद्याअधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना रविवारी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर चहापानासाठी निमंत्रित केले आहे. तत्पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांची संयुक्त बैठक दुपारी होणार असून तीत चहापानावरील बहिष्काराबाबत निर्णय घेण्यात येईल.विधानसभा आणि विधान परिषदेत एकाच प्रकारचे आरोप करून पुनरावृत्ती करण्याऐवजी वेगवेगळे आरोप करून सरकारची कोंडी करण्याची विरोधकांची खेळी असेल.प्रत्येक आठवड्यात एक प्रस्ताव चर्चेसाठी आणत आरोपांची राळ उडवायची आणि सरकारला लक्ष्य करायचे अशीही विरोधकांची योजना आहे.किमान तीन मंत्र्यांविरुद्ध घोटाळ्यांचे नवीन आरोप करण्यासाठीची ‘सामग्री’ विरोधकांनी तयार ठेवली आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना